Skip to main content

रायगड जिल्हा वन्यजीव रक्षकांचे चर्चासत्र संपन्न वन्यजीवांसाठी तात्पुरत्या उपचार केंद्राची मागणी.

रायगड जिल्ह्यातील वन्यजीव जीव रक्षकांना एकत्रितपणे चर्चासत्रात आमंत्रित करून वन्य जीवावर प्राथमिक उपचार करणेकरिता टी. टी. सी. अर्थात टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षकांनी" मार्गदर्शन केले आणि सल्लामसलत केली. वाढत्या नागरी वस्ती, उद्योग धंदे, रस्ते त्याचप्रमाणे इतर निर्माणामुळे रायगड जिल्ह्यातील जैविक वैविध्यता संकटात आली आहे. त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याने वेळीच पावले उचलून प्राणी, पक्षी, सर्प, जलचर इत्यादींचे संवर्धन, संरक्षण होतअसताना त्यांच्यावर उपचार करून प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सर्वांनी वनखात्याशी समन्वय साधून तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, गोरेगाव" येथे रायगड जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक एकत्र आले होते. वन्यजीव रक्षकांनी आपल्या समस्या रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक यांच्यासमोर मांडल्या आणि त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना व्हाव्यात याबाबतीतही चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील वन्यजीव रक्षकांनी जखमी वन्यजीवावर तत्काळ उपचार होणे कामी महाड आणि पनवेल तालुक्यात टी टी सी चे निर्माण व्हावे अशी मागणी केली. वनखात्याच्या माध्यमातून वन्यजीव रक्षण होत असतेच ,मात्र रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि व्यापकता पाहता, वन्य जीव रक्षकांनी आपले कर्तव्य म्हणून वनखात्याला सहकार्य करावे आणि ते करत असताना कोणतीही समस्या उद्भवल्यास "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक" सहकार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रेमसागर मिस्त्री, गणेश मेहेंदळे, अमित चव्हाण या विद्यमान आणि उल्हास ठाकूर माजी मानद जीवरक्षकानी यावेळी समन्वयकाची भूमिका पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन व  पुरस्कार प्रधान सोहळा उत्साहात संपन्न

(खोपोली - किशोर साळुंके ) ) - रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील, यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले . वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक ...