Skip to main content

रायगड जिल्हा वन्यजीव रक्षकांचे चर्चासत्र संपन्न वन्यजीवांसाठी तात्पुरत्या उपचार केंद्राची मागणी.

रायगड जिल्ह्यातील वन्यजीव जीव रक्षकांना एकत्रितपणे चर्चासत्रात आमंत्रित करून वन्य जीवावर प्राथमिक उपचार करणेकरिता टी. टी. सी. अर्थात टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षकांनी" मार्गदर्शन केले आणि सल्लामसलत केली. वाढत्या नागरी वस्ती, उद्योग धंदे, रस्ते त्याचप्रमाणे इतर निर्माणामुळे रायगड जिल्ह्यातील जैविक वैविध्यता संकटात आली आहे. त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याने वेळीच पावले उचलून प्राणी, पक्षी, सर्प, जलचर इत्यादींचे संवर्धन, संरक्षण होतअसताना त्यांच्यावर उपचार करून प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सर्वांनी वनखात्याशी समन्वय साधून तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, गोरेगाव" येथे रायगड जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक एकत्र आले होते. वन्यजीव रक्षकांनी आपल्या समस्या रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक यांच्यासमोर मांडल्या आणि त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना व्हाव्यात याबाबतीतही चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील वन्यजीव रक्षकांनी जखमी वन्यजीवावर तत्काळ उपचार होणे कामी महाड आणि पनवेल तालुक्यात टी टी सी चे निर्माण व्हावे अशी मागणी केली. वनखात्याच्या माध्यमातून वन्यजीव रक्षण होत असतेच ,मात्र रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि व्यापकता पाहता, वन्य जीव रक्षकांनी आपले कर्तव्य म्हणून वनखात्याला सहकार्य करावे आणि ते करत असताना कोणतीही समस्या उद्भवल्यास "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक" सहकार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रेमसागर मिस्त्री, गणेश मेहेंदळे, अमित चव्हाण या विद्यमान आणि उल्हास ठाकूर माजी मानद जीवरक्षकानी यावेळी समन्वयकाची भूमिका पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त