Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने गरीब ,गरजू मुलांना शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन ..

  खोपोली-- (किशोर साळुंके )  प्रजासत्ताक  दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या  गावातील , सामाजिक कार्यात सक्रिय आसलेला  सिद्धार्थ स्पोर्ट क्लब या मंडळाच्या  वतीने येथील  डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर  समाजमंदिरामध्ये विविथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सिद्धार्थनगर या गावातील शेकडो गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे   प्रभाग ३ मधील विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वाटप  करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात  आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब  आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान   मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या   कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी  महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे व्येक्तिला स्वतंत्र्य ,हक्क ,कायद्याने  बहाल करणारा दिवस असून २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले.डाँ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात भारतात

पळस्पे पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघात प्रवण क्षेत्रातील अति महत्वाच्या टप्प्याच्या क्षेत्रांत येणाऱ्या  पळस्पे पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३२व्या रस्ता सुरक्षा सप्ताह २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  कु योगिता पारधी, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उपअधिक्षक रायगड विभाग  संदीप भागडीकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग सुदाम पाचोरकर, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर आणि इतर मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.  राजिप च्या अध्यक्षा  कु योगिता पारधी यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन ही  समाजाची गरज असल्याने त्याचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेसारख्या संस्थांनी करणेचे गरजेचे आहे असे प्रतिपादन करताना तहानभूक आणि आपलं आयुष्य विसरून महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस यंत्रणेचे आणि सामाजिक संस्थांचे त्यांनी कौतुक करून आभार मानले. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे  नियंत्रणात आलेले अपघाताचे  प्रमाण  लॉक डाऊनमध्ये शिथ

कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे विधान परिषद उपसभापती

 मुंबई- कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदाराचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. आज विधानभवनात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाळा सहकारी बँक ठेवीधारकांना न्याय देणे, अवैध खासगी सावकारीवर नियंत्रण, ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामबाबत सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असल्याने ठेवीदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्याचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी आणि या ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील यासाठी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील तक्रारींची चौकशी वेळेत पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.                             या बँकेचे इत

सहजसेवा फाऊंडेशनच्या ज्ञानदीप उपक्रमाची IEA Book of World Record मध्ये नोंद*

2020 ह्या वर्षात जगभर कोरोनाने थैमान घातले होते,आजही संपूर्ण जगावर भीतीचे सावट आहे.नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नेतृत्वाची चमक दाखविणाऱ्या रेकॉर्ड मॅन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या संकल्पनेतुन व उपक्रम प्रमुख सलीम लोगडे यांनी सहजसेवा     फाऊंडेशच्या माध्यमातून                                                                                 01 जानेवारी रोजी येणाऱ्या वर्षाचे स्वागत करूया अर्थातच नवीन वर्ष सुखाचे जावो या प्रार्थनेतून गीता सुधाकर घारे फाऊंडेशन,पारले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड,खरसुंडी ,व्हिजन फ्रेश पुणे,सुवर्णा ताई मोरे सामाजिक संस्था,आशियाना ड्रीम होम्स प्रा. लिमिटेड,कोहिनुर टेलिकॉम खोपोली,महेश एजन्सी खालापूर,पद्मावती ट्रेडर्स खोपोली यांच्या सह आयोजनातून यावर्षी कर्जत व  खालापूर तालुक्यातील असणाऱ्या विविध शाळेच्या प्रांगणात दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 07.00 वाजता ज्ञान दिवा प्रकाशित ( दीप प्रज्वलीत ) करून येणारे  2021 हे वर्ष आनंदाचे व मांगल्याचे असावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. समाजाप्रति संदेश देणाऱ्या या  उपक्रमाची IEA Book
 आरोग्य सहकार संस्था आणि अतुल पाटील मित्रपरिवार आयोजित नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद         खोपोली - किशोर साळुंके                पैसे अभावी रूग्णांची उपचारासाठी गैरसोय होवू नये तसेच तातडीने रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आरोग्य सहकार चँरिटेबल संस्था पुणे जिल्ह्यात सेवाभावी आणि सहकारी तत्वावर काम करीत असतानाच खोपोली शहरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी अतुल पाटील मित्रपरिवाराच्या सयुंक्त विद्यामाने एन.पी.फार्म येथे मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीर अयोजित केले होते या शिबीरात खोपोली शहरातील बहुसंख्य नागरिक महिलांनी नेत्रतपासणी केली आहे.         नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा उद्योजक सनी पाटील,एन पी ट्रस्टचे इंद्रसेन घोडके,रमाकांत रावळ,सोहन साखरे,योगेश वाघमारे, विकी पाटील,आरोग्य सहकार संस्थेचे डॉ. शेळके,डॉ. खडसे,शिबिर प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री राहुल सावंत,शहर समन्वयक संदीप कुंजीर उपस्थित होते.नेत्र तपासणी शिबीरात १२० जणांनी नेत्रतपासणी

खालापूर तालुक्यातील दहागाव संघर्ष समितीच्या मागे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकारी असेल. शेतकऱ्यांवर होणार अन्याय खपवून घेणार नाही : आमदार जयंत पाटील

खोपोली प्रतिनिधी / किशोर साळुंखे  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्याय खालापूर तालुक्यातील  दहागावाटली शेतकारी वर्गावर  करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला निर्बंध घालण्यासाठी वेळोवेळी विधान  परिषदेत आपण आवाज उठवला आहे आणि त्याचसाठी दहागाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जो संघर्ष उभा  राहिला त्याला [पाठिंबा देण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचा निर्धार आज शासनाच्या विरोधात खाला पूर तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चाचे वेळी संबोधित करणाऱ्या तडाखेबाज भाषणातून व्यक्त केला.  आमची संघर्षाची परंपरा आहे. आम्ही सिडकोचा लढा लढलो आणि न्याय मिळवून घेतला. आम्ही सेज विरुद्ध एल्गार पुकारला आणि  त्यात यशस्वी झालो. आता दहा गाव संघर्ष समितीने  पुकारलेला संघर्ष तडीस नेणारच असा विश्वास यावेळी बोलून  दाखवला. ज्यावेळी ज्या जमिनीवर धान्याचा एक कण  पिकत नव्हता  त्यावेळी कवडीमोल भावाने जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या, त्या कित्येक वर्षं ओस पडल्या होत्या मात्र  आज त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असताना त्याच जमिनीला