Skip to main content

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्रोजे्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले गेले होते. यावेळी वाहतूक पोलिस यंत्रणेच्या पळस्पे आणि बोरघाट विभागाचे निरीक्षक वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, शेवळे, भोसले, पोलीस उपनिरीक्षक लांगी मोरे चव्हाण आणि शिंदे तसेच अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, अमोल कदम, हनीफ कर्जीकर, अमोल ठकेकर उपस्थित होते.
होते

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

कर्जतला शिव जनसंपर्क अभियांनांतर्गत शिबीर संपन्न

खोपोली :(किशोर साळुंके ) :  संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकत वाढविण्यासाठी शिवसेनेने केलेली विकास कामे घराघरात पोहचविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 12 ते 24 जुलै पर्यंत शिव संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती देण्यासाठी कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर आयोजित केले होते. यासमयी जिल्हा पदाधिकारी, खालापूर तालुका व खोपोली शहरातील पदाधिकारी, लोक प्रतिनिधी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

🛑 खाजगी इमारत तोडताना संबधित ठेकेदाराने शासकीव नियम बसवले धाब्यावर... खोपोली शहरातील जुने - मुंबई हायवे लगत आसणार्या ग्रीनपार्कच्या शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील इमारत शासकीव परवाणगी न घेताच तोडण्याचे बेकायदेशीर काम सूरु ?

खोपोली (किशोर साळुंके ) खोपोली - शहरातील शिळफाटा येथील ग्रीनपार्क हाँटेल शेजारील बंद असलेल्या पेट्रोल पंपा शेजारील एक पाच ते सहा मजली इमारत जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे बेकायदेशीर काम दिवसभर जोरात सूरु असून संबधित ठेकेदाराचे मात्र या इमारती शेजारील व हायवे लगत ये जा करणार्या वाहतूक चालकांच्या सुरक्षिततेकडे मात्र अक्षम्य दृर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.वरिल इमारत तोडत असताना येथील नागरीकांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे या ठिकाडी होणार्या धूळी मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष धूळ खात पडणार्या सदर इमारत तोडण्यासाठी शासकीय परवाणगी घेतली नसल्याचे समजते ,एखादी इमारत जमीनदोस्त करताना या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षांचे नियम पाळूनच इमारत तोडण्याची प्रक्रिया केली गेली पाहीजे.इमारती भोवती कमीत कमी तिस फुटी लोखंडी पत्रे लावणे, आजूबाजूंच्या नागरीकांना धूळीचा त्रास होवू नये तसेच या इमरती मधील दगडी व लोखंडी तुकडे उडून रस्यावर व शेजारील नागरीकांच्या घरावर पडून आर्थिक नूकसान व दुखापत होवू नये यासाठी इमारती भोवती पत्रे व कापडी नेट वा