Skip to main content

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साजगांव यात्रेवर कोरोनाचे संकट :यात्रा रद्द खोपोली (सचिन यादव):संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध





       खोपोली (सचिन यादव):संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या खोपोली साजगांव मधिल बोंबल्या विठोबा च्या यात्रेवर कोरोनाचे संकट पसरले असून कोरोना आजार पुन्हा मोठया जोमाने डोके वर काढत असल्याने या वर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व ग्रामस्थांनी घेतल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

      संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी सध्या विविध देवतांच्या यात्रांचा महोत्सव सुरु होत असून पंढरपूर यात्रे नंतरचा पहिल्या यात्रेचा मान खोपोलीतील साजगांव यात्रेचा असतो. बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे. धाकटी पंढरी म्हणून ख्याती असलेली ही भूमी जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. स्वतः तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत असल्याची नोंद आहे.तेव्हा पासून अद्याप पर्यंत अव्याहत पणे सुरु असलेल्या या यात्रेच्या परंपरेवर कोरोनाने खंड पाडला असून या वर्षी पहिल्यांदाच जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना मुळे ही यात्रा रद्द झाली आहे.

      येणाऱ्या एकादशी पासून सुरु होणारी ही यात्रा पंधरा दिवस चालते. करोडो रुपयांची उलाढाल होऊन शेकडो कुटुंबांचा उदर निर्वाह चालतो. विविध उद्योग धंदे लागल्याने एक वेगळीच रेलचेल पहायला मिळते. पण यंदा कोरोनामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. फक्त दर्शनाची संधी भाविकांना देण्यात येणार आहे. पण यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.


(सदरील छायाचित्रात विठोबा रखुमाई मंदिर दिसत असून समोरील पटांगणावर भव्य दिव्य भरणारी यात्रा यावर्षी रद्द केल्याने मोठया प्रमाणात वाढलेली झाडे, झुडपे, गवत दिसत आहे -सचिन यादव खोपोली )

मोबाईल -7744093474

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...