Skip to main content

खालापूर तालुक्यातील दहागाव संघर्ष समितीच्या मागे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकारी असेल. शेतकऱ्यांवर होणार अन्याय खपवून घेणार नाही : आमदार जयंत पाटील


खोपोली प्रतिनिधी / किशोर साळुंखे 




महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्या


महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्याय खालापूर तालुक्यातील  दहागावाटली शेतकारी वर्गावर  करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला निर्बंध घालण्यासाठी वेळोवेळी विधान  परिषदेत आपण आवाज उठवला आहे आणि त्याचसाठी दहागाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जो संघर्ष उभा  राहिला त्याला [पाठिंबा देण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचा निर्धार आज शासनाच्या विरोधात खाला

पूर तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चाचे वेळी संबोधित करणाऱ्या तडाखेबाज भाषणातून व्यक्त केला.  आमची संघर्षाची परंपरा आहे. आम्ही सिडकोचा लढा लढलो आणि न्याय मिळवून घेतला. आम्ही सेज विरुद्ध एल्गार पुकारला आणि  त्यात यशस्वी झालो. आता दहा गाव संघर्ष समितीने  पुकारलेला संघर्ष तडीस नेणारच असा विश्वास यावेळी बोलून  दाखवला. ज्यावेळी ज्या जमिनीवर धान्याचा एक कण  पिकत नव्हता  त्यावेळी कवडीमोल भावाने जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या, त्या कित्येक वर्षं ओस पडल्या होत्या मात्र  आज त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असताना त्याच जमिनीला करोडोंचा भाव आलाय. याची पूर्व कल्पना त्या जमीन खरेदी करणाऱ्या धन दांडग्यांना होती. आता शासनाकडून  मूळ किमतीपेक्षा जो अधिक भाव मिळेल त्यातला ५० % टक्के वाट हा मूळ मालकाला दिला पाहिजे अशी आमची मागणी असेल. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, त्याच सोबत जमिनीचे व्यवहार करताना दलालांची लुडबुड नसावी असं आमचा आग्रह असेल असे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आणि तरुणाना विशेष करून महिलांनी  एकजुटीने राहण्याचे  त्यांनी आवाहन केले. भुसंपादन करण्याकरिता तहसीलदार यांच्या कार्यालयात बैठक न लावता गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन शासनाची भूमिका पटवून दिली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. जगातला पहिलया शेतकऱ्यांच्या संपाचे आम्ही जनक आहोत,  त्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमचे अस्तित्व आहे,  म्हणून आम्हाला  न्याय आणि आणि हक्क कसे मिळवून घ्यायचे याची समज आहे. शासनाने आम्हाला जमेस धरून चालू नये असा खंबीर इशाराही यावेळी त्यांनी दिला. गुण्या  गोविंदाने द्याल तर ठीक अन्यथा आमचे हक्क  कसे प्राप्त करायचे जाण आम्हाला आहे.  आम्ही सद्या सामोपचाराने घेत आहोत म्हणून  मवाळ झालो असा गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी प्रतिपादन केले. हि संघर्षांची सुरवात आहे असे सूतोवाचही  त्यांनी केले. 


ठळक मुद्दे  १  : दहागाव संघर्ष समितीचे युवा सदस्य आणि महिला  जमीन आमच्या हक्काची, आमच्या मागण्या मेनी करा अश्या घोषणा देत होते. 

ठळक मुद्दे  २ : मोर्चामध्ये सहभागी झालेलय गावकऱ्यांनी  वारकरी पद्धतीने वारीचे वातावरण निर्माण करताना तिला मृदूंगाच्या थेकायवर भजनांचे गायन केले. 

ठळक मुद्दे  ३ : मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्या नंतर व्यासपीठ म्हणून चक्क बैलगाडीचा झालेला वापर वातावरण निमित्ती करत  होता. 

ठळक मुद्दे  ४ : महसूल आणि पोलीस प्रशासनाले बहुतांशी अधिकारी हे शेतकरी वर्गातले असल्याने मोर्चाकडे पाहण्याचा त्यांचा  दृष्टीकोन सकारात्मक होता.

ठळक मुद्दे  ५ : माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पठिंबा दिल्याचे स्वागत आम जयंत पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त