Skip to main content

पळस्पे पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन





यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघात प्रवण क्षेत्रातील अति महत्वाच्या टप्प्याच्या क्षेत्रांत येणाऱ्या  पळस्पे पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३२व्या रस्ता सुरक्षा सप्ताह २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  कु योगिता पारधी, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उपअधिक्षक रायगड विभाग  संदीप भागडीकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग सुदाम पाचोरकर, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर आणि इतर मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 


राजिप च्या अध्यक्षा  कु योगिता पारधी यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन ही  समाजाची गरज असल्याने त्याचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेसारख्या संस्थांनी करणेचे गरजेचे आहे असे प्रतिपादन करताना तहानभूक आणि आपलं आयुष्य विसरून महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस यंत्रणेचे आणि सामाजिक संस्थांचे त्यांनी कौतुक करून आभार मानले. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे  नियंत्रणात आलेले अपघाताचे  प्रमाण  लॉक डाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढल्याची खंत व्यक्त करताना सर्वानी वाहतुकीचे नियम हे पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणासाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी पाळावेत असे कळकळीचे आवाहन केले.   पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी  सुरक्षा सप्ताहाची मुदत वाढून ती महिना भर झाल्याचा मुद्दा अधोरेखित महामार्गावर  वाहन चालवतांना  सुरक्षितता कशी बाळगावी या संबधी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहन अपघात रोखणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव प्र्त्येकानी ठेवावी असे मत व्यक्त केले.अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर यांनी वाहतूक सुरक्षा हा विषय शालेय जीवनापासून विध्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला पाहीजे त्यासाठी अभ्यासक्रमात त्या बाबीचा समावेश झाला पाहिजे असे सांगितले.  पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग सुदाम पाचोरकरयांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


पळस्पे पोलीस मदत्त केंद्राची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या पोलीस सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी यांच्या टीमचे या भव्य आयोजनाबध्दल सर्वानी कौतुक केले. या अपघातप्रसांगीं मदतीला येणाऱ्या देवदूतांचा आणि कोव्हीड काळात मदतीसाठी आलेल्या योद्धयांचा  तसेच काही संस्थांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात आला.  महामार्ग सुरक्षेचे नियम वलयांकित करणाऱ्या जाहिरातीचे यावेळी प्रकाशन करून तीच्या वितरणाचा प्रारंभ केला गेला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...