Skip to main content

प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने गरीब ,गरजू मुलांना शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन ..



  खोपोली-- (किशोर साळुंके )  प्रजासत्ताक  दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या  गावातील , सामाजिक कार्यात सक्रिय आसलेला  सिद्धार्थ स्पोर्ट क्लब या मंडळाच्या  वतीने येथील  डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर  समाजमंदिरामध्ये विविथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सिद्धार्थनगर या गावातील शेकडो गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे   प्रभाग ३ मधील विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वाटप  करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात  आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब  आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान   मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या   कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी  महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे व्येक्तिला स्वतंत्र्य ,हक्क ,कायद्याने  बहाल करणारा दिवस असून २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले.डाँ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात भारतातील प्रत्येकाला एकमत देण्याचा अधिकार देवून त्यामताच्या अधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली आसल्याचे  या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेक किशोर पानसरे यांनी असे आपले विचार मांडत  प्रतीवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या वाटप करत सामाजिक बांधिलकी जपणार्या वरिल मंडळाच्या सर्व सभासदांचे पानसरे यांनी कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या   खोपोली शहर महिला अध्यक्षा  सुवर्णा मोरे यांनीही यावेळी आपले  विचार मांडत,  सिद्धार्थ स्पोर्ट क्लबने केलेल्या  स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितीत नागरीक व लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी नगरसेवक किशोर पानसरे,रा.काँ.पक्षाच्या  खोपोली शहर महिला  अध्यक्षा सुवर्णा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे,भगवान खंडागळे , उद्योजक सुनिल तेलवणे , सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सोनकांबळे , सौ .उमाताई खंडागळे,सौ. पगारे ,विठ्ठल मोरे, यादव ,किशोर साळुंके व अन्य मान्यवर उपस्थितीत होते

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...