Skip to main content

सहजसेवा फाऊंडेशनच्या ज्ञानदीप उपक्रमाची IEA Book of World Record मध्ये नोंद*




2020 ह्या वर्षात जगभर कोरोनाने थैमान घातले होते,आजही संपूर्ण जगावर भीतीचे सावट आहे.नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नेतृत्वाची चमक दाखविणाऱ्या रेकॉर्ड मॅन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या संकल्पनेतुन व उपक्रम प्रमुख सलीम लोगडे यांनी सहजसेवा     फाऊंडेशच्या माध्यमातून                                                                                 01 जानेवारी रोजी येणाऱ्या वर्षाचे स्वागत करूया अर्थातच नवीन वर्ष सुखाचे जावो या प्रार्थनेतून गीता सुधाकर घारे फाऊंडेशन,पारले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड,खरसुंडी ,व्हिजन फ्रेश पुणे,सुवर्णा ताई मोरे सामाजिक संस्था,आशियाना ड्रीम होम्स प्रा. लिमिटेड,कोहिनुर टेलिकॉम खोपोली,महेश एजन्सी खालापूर,पद्मावती ट्रेडर्स खोपोली यांच्या सह आयोजनातून यावर्षी कर्जत व  खालापूर तालुक्यातील असणाऱ्या विविध शाळेच्या प्रांगणात दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 07.00 वाजता ज्ञान दिवा प्रकाशित ( दीप प्रज्वलीत ) करून येणारे  2021 हे वर्ष आनंदाचे व मांगल्याचे असावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

समाजाप्रति संदेश देणाऱ्या या  उपक्रमाची IEA Book of वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.अंधेरी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार स्वीकारण्यात आला.

यासाठी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सुधाकर घारे,कर्जत तालुका गट शिक्षण अधिकारी श्री.संतोष दौंड सर,श्री.किशोर शेळके,अभि ग्रुप देवन्हावे,रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली,खोपोली नगरपरिषद शिक्षण मंडळाचे समनव्य श्री.सुनील पाटील,ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,सद्गुरू ग्राफिक्स,शीतल गायकवाड,सहजसेवा फाऊंडेशनचे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.


सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्ष

श्रीमती माधुरी गुजराथी,महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ.माधुरी शिरोडकर,महाराष्ट्र युवा प्रमुख श्री. गणेश पवार,सचिव

,सौ.वर्षा मोरे,खजिनदार

श्री.संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख 

सौ.जयश्री कुलकर्णी,रायगड जिल्हा प्रमुख श्री.सुजित धनगर,रायगड जिल्हा महिला प्रमुख सौ.ज्योती अवघडे,खालापूर तालुका प्रमुख

तौफिक कर्जीकर,खालापूर तालुका महिला प्रमुख सौ.प्रियांका पाटील,कर्जत तालुका प्रमुख श्री.जगदीश दगडे ,कर्जत तालुका महिला प्रमुख 

सौ.शर्वरी कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमाच्या माध्यमातून गावाचे,तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे  व देशाच्या नावलौकीकात भर पडणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...