Skip to main content






 पाली खोपोली महामार्ग विनफिट कंपनी मे अखेर पुर्ण करणार

.......................................

डायरेक्टर समीर जेधे व शंकर पाटिल यांचे प्रतिपादन

........................................

स्थानिक अनुभवी रवी देवकर यांच्या सारख्या अनुभवी ठेकेदारांमुळे उत्कृष्ट दर्जाचे काम

====================

खोपोली (प्रतिनिधी )-

⭕पाली खोपोली महामार्गचे काम 2016/17 चे काळात मंजूर होऊन सुरु झाले...

⭕साधारण 40 किमी चे काम आहे..

⭕मूळ ठेकेदाराकडून कोरोना काळापर्यंत दोन पोट ठेकेदारांनी काम घेतले..

⭕दोन्ही ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करत तुकड्या -तुकड्यात काम केले..

⭕त्याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना होत होता...

⭕सरते शेवटी विनफिट टेक्नो इंजिनियर्स प्रा. लि. कंपनीने हे काम हाती घेतले...

⭕20नोव्हेंबर 20रोजी या कंपनीने काम हाती घेतले....

⭕या कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांनी सर्व रस्त्याचा सर्वे केला..

⭕सर्व ठिकाणी निकृष्ट व अर्धवट तुकड्यात काम होते....

⭕नदी, नाल्यावरील ब्रिज -मोऱ्या अर्धवट होत्या...

⭕संपूर्ण सर्वे पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली...

⭕आज मितीस 22 किमी पर्यंतचे काम पुर्ण केले आहे...

⭕आता नदी, नाल्यावरील ब्रिज व मोऱ्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु असून ते पुर्ण होताच मे महिन्याच्या अखेर पर्यंत पुर्ण रस्त्याचे काम पुर्ण करून सदर रस्ता सरकार च्या ताब्यात देण्याचा विनफिट कंपनीचा मानस..

⭕काही ठिकाणी स्थानिक विघ्न संतोषी माणसे /नेतेमंडळी कामात अडथळे आणत असल्याने कामात दिरंगाई होते...

⭕कामगारांना त्रास देणे, काम बंद पडणे, मेलटिंग प्लांट बंद करणे असे प्रकार घडतात...

⭕पण सध्या डायरेक्टर आणि इंजिनिअर समजूत घालून काम पूर्णत्वकडे नेण्यात सफल होत आहेत...

⭕रायगड मधिल प्रसिद्ध ठेकेदार रवी देवकर यांच्या सारखे अनुभवी ठेकेदार कंपनी सोबत काम करीत आहेत...

⭕रवी देवकर यांनी शीळफाटा खोपोली ते बोरघाटा पर्यंतचा महामार्गीय रस्ता उत्कृष्ट दर्जाचा बनविल्याने संपूर्ण खोपोली मध्ये त्यांचे कौतुक होत आहे...

⭕त्याच पद्धतीने त्यांनी पाली खोपोली च्या रस्त्याचे काम सुरु केले आहे...

⭕अदय यावत यंत्रणा, मनुष्यबळ,उच्च शिक्षित इंजिनियर, स्पॉट लेव्हल ला काँक्रेट मेलटिंग प्लांट, रस्त्या मधिल चढ खनून सपाठीकरण करणे, पिचिंग, उत्कृष्ठ दर्जाची खडी कॉंकरीट माल, त्यावर गोणी टाकून सतत पाण्याचा फवारा, ब्रिज साठी योग्य असे स्टील -लोखंड याचा वापर, रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 मिटर पर्यंत साईड पट्टी माती भराव.. असे उत्कृष्ठ काम सध्या सुरु आहे...

⭕हे काम पाहून स्थानिक नागरिक व प्रशासन खूष आहे..

⭕या संपूर्ण रस्त्यात काही ठिकाणी वन विभाग (फ़ॉरेस्ट)ची जागा येते...

⭕तेथे रस्ता रुंदीकरण, कॉंकरीट करण्यास मज्जाव आहे...

⭕परवानगी मिळालीच तर आहे त्यावरच डांबरीकरण होऊ शकते..

⭕विनफीट कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांचा मे महिन्या अखेर सदर रस्ता पुर्ण करण्याचा मानस त्यांच्या कामाची रुपरेषा पाहून पुर्ण होईल अशी अपेक्षा प्रवासी करीत आहेत...

====================

🛑महाराष्ट्र टाईम्स 25 NEWS🛑

✒️मुख्य संपादक ✒️

सचिन यादव

7744093474

✒️कार्यकारी संपादक ✒️

अभिजित दरेकर

9764992525

✒️खोपोली प्रमुख ✒️

किशोर साळुंके

7887741917

====================


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...