खोपोली प्रतिनिधी -किशोर साळुंखे -
मोहोनवाडी रोडच्या कामात खो घारणारा तो विकासकंठक कोण ....
* सदर काम त्वरीत सूरु न केल्यास नगरपालिकेवर येथील नागरीकांचा आक्रोश मोर्च...
* प्रभाग ३ मधील कार्यसम्राट समजले जाणारे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन २८ नोहेंबर रोजी मोहोनवाडी,प्रकाशनगर ,चैतन्यनगर येथील नागरीकांसाठी रस्ता रुंदीकरण व पुलाच्या अतिमत्वाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.......
* गेली अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेला रस्ता रुंदीकरण व पुलाच्या कामाला पाच ते सहा दिवसात सूरुवात झाली होती....
* नागरिकांसाठी वरिल पुल व वाढीव रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावून लोकार्पण करण्याच्या उद्देशाने संबंधित ठेकेराराने आवश्यक साधनसामग्री लावून सदर कामाला जोरदार सूरवात केली होती...
* या विभागातील हजारो नागरीक सद्या मोहोन राँकी कंपनीच्या जागेतून ये जा करत असून नागरीकांना कंंपनीकडून या रोडवरुन ये जा करण्यास मज्जाव केला जात आहे... पर्यायाने येथील नागरीकांना लक्ष्मीनगर मार्गाने बाजारपेठ व अन्य महत्वाच्या कामासाठी लांबच्या पल्याने प्रवास करुन रिक्षासाठी अधिक पैसे मोजावे लगत आहेत.....
* मग आज वरिल काम ठेकेदारामार्फत सूरु असताना सदर काम गेले काही दिवस बंद झाले आहे ...
+ सदर काम ठेकेदाराने स्वताहून बंद बंद केले आहे का ? या विभागतील नागरिकांनी केले आहे का ? किंवा कोणत्या नेत्याने चिरीमिरीसाठी बंद केले,आहे का ? विकासकामाला विरोध करुन नागरिकांना वेठीस धरधारा तो नक्की कोण ? असे अनेक प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे...
* काम बंद करणार्यांविरोधात येथील नागरीकांमधे आक्रोश .. विकासकामात आडवा येवून त्रास देत काम बंद करणार्याचे आम्हाला नाव सांगा आम्ही त्यालाच आडवा करु अशी तिखट प्रतिक्रिया येथील नागरीकांमधून उमटत आहे.....
* मुख्याधिकारी साहेब आपण खुद्द या गंभीर घटणेकडे लक्ष देवून वरिल काम त्वरित सूरु करुन काम बंद करणार्या विरोधात सरकारी कामात आडथळा निर्माण करणार्यां विरोधात योग्यती कारवाई करु अन्यथा आम्हाला आपल्या कर्यालयासमोर मोर्चा काढावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून उमटत आहे....................
* ठेकेदाराने येथील नागरीकांना काम बंद पडण्यामागचे व पाडण्यामागची सत्यता येथील नागरिकांसमोर येवून सांगवी , यामागचे खरे कारण न सांगितल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही पालिके समोर लवकरच अंदोलन करणार असल्याचे समजते....
* तरी मेहेरबान मुख्याधिकारी साहेबांनी घटणास्थळी जावून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या विषयाची माहीती घेवून त्वरीत काम सूरु करुन शासकीय कामात खोडा घालणारे व अडथळा आणणार्या त्या विकासकंठकावर त्वरीत कारवाई करावी...अशी मागणी येथील नागारिकांकडून होताना दिसत आहे...
Comments
Post a Comment