Skip to main content

 खोपोली प्रतिनिधी -किशोर साळुंखे - 




  मोहोनवाडी रोडच्या कामात खो घारणारा तो  विकासकंठक कोण ....

*  सदर काम त्वरीत सूरु न केल्यास नगरपालिकेवर येथील  नागरीकांचा आक्रोश मोर्च...

* प्रभाग  ३ मधील कार्यसम्राट समजले जाणारे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून  लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन २८ नोहेंबर रोजी मोहोनवाडी,प्रकाशनगर ,चैतन्यनगर येथील नागरीकांसाठी रस्ता रुंदीकरण व पुलाच्या  अतिमत्वाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.......   

* गेली अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेला  रस्ता रुंदीकरण व पुलाच्या    कामाला  पाच ते सहा दिवसात  सूरुवात झाली होती....


*  नागरिकांसाठी वरिल पुल व वाढीव रस्त्याचे  काम   लवकरात लवकर मार्गी लावून  लोकार्पण करण्याच्या उद्देशाने संबंधित ठेकेराराने आवश्यक साधनसामग्री लावून सदर कामाला जोरदार सूरवात केली होती...


* या विभागातील  हजारो नागरीक सद्या मोहोन राँकी कंपनीच्या जागेतून ये जा करत असून  नागरीकांना कंंपनीकडून  या रोडवरुन ये जा करण्यास मज्जाव केला  जात आहे... पर्यायाने येथील नागरीकांना लक्ष्मीनगर मार्गाने बाजारपेठ व अन्य महत्वाच्या  कामासाठी लांबच्या पल्याने प्रवास करुन  रिक्षासाठी अधिक पैसे मोजावे लगत आहेत.....


* मग आज वरिल काम ठेकेदारामार्फत सूरु असताना सदर काम गेले काही दिवस बंद झाले आहे ...

+   सदर काम ठेकेदाराने स्वताहून बंद  बंद केले आहे का ?  या विभागतील नागरिकांनी केले आहे का ? किंवा कोणत्या नेत्याने चिरीमिरीसाठी बंद केले,आहे का ? विकासकामाला विरोध करुन नागरिकांना वेठीस धरधारा तो नक्की  कोण ?   असे अनेक प्रश्न येथील  नागरीकांना पडला आहे...


* काम बंद करणार्यांविरोधात  येथील नागरीकांमधे आक्रोश .. विकासकामात आडवा येवून  त्रास देत  काम बंद करणार्याचे आम्हाला  नाव सांगा आम्ही त्यालाच आडवा करु अशी तिखट  प्रतिक्रिया येथील नागरीकांमधून उमटत आहे.....                      

*  मुख्याधिकारी साहेब आपण खुद्द या गंभीर घटणेकडे लक्ष देवून  वरिल काम त्वरित सूरु करुन काम बंद करणार्या विरोधात सरकारी कामात आडथळा निर्माण करणार्यां विरोधात योग्यती कारवाई करु अन्यथा आम्हाला आपल्या कर्यालयासमोर मोर्चा काढावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून उमटत आहे.................... 


* ठेकेदाराने येथील नागरीकांना काम बंद पडण्यामागचे व पाडण्यामागची  सत्यता येथील नागरिकांसमोर येवून सांगवी , यामागचे खरे   कारण न सांगितल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही पालिके समोर लवकरच अंदोलन करणार असल्याचे समजते....

*   तरी मेहेरबान मुख्याधिकारी साहेबांनी घटणास्थळी जावून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या विषयाची माहीती घेवून त्वरीत काम सूरु करुन शासकीय कामात खोडा  घालणारे व अडथळा आणणार्या त्या विकासकंठकावर  त्वरीत कारवाई करावी...अशी मागणी येथील नागारिकांकडून होताना दिसत आहे...

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...