Skip to main content

तहानलेल्यांना पाणी पाजण्यासाठी भाजपचे किर्ती ओसवाल यांनी केली पाणपोईची व्येवस्था !


किशोर साळुंखे /खोपोली प्रतिनिधी 


🛑  तहानलेल्यां जिवांना  पाणपोईचा आधार..

🛑 वरिल स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..


🛑 खोपोली -- उन्हाळ्याची चाहूल लागली कि उन्हाचा पारा चढू लागतो  तसतशी घशाला कोरड पडते तसतशी घशाला चार घोट पाण्याचे घ्यावशे वाटतात.आशा तहानलेल्या जिवांची तहान भागविण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष तथा खोपोली शहरातील   यशस्वी युवा उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल संकल्पनेतून खोपोली शहरातील नागरिकांच्या गर्दीच्या  ठिकाणी शहरातील मुख्यबाजारपेठेत मोफत  पाणपोईची व्येवस्था सूरु  करण्यात आली.दि.15 मार्च रोजी भाजपाच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी  पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.खोपोली शहराचा विचार करता शहरातल्या  मुख्यबाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते तसेच या ठीकाणी दर  गुरुवारी आठवढ्याचा बाजार भरत असतो. शहरातील व ग्रामिण भागातून  या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना बाटली बंद पाणी विकत घेवून पिणे  सर्वांनाच शक्य नसल्यामुळे त्या प्रत्येक तहानलेल्यांना पाणी पाजणे हि आपली भारतीय संस्कृती असून पाण्यापासून वंचित राहू नये या प्रामाणिक उद्देशाने  भाजपचे युवा नेते किर्ती ओसवाल यांनी पाणपोईची व्येवस्था सूरु केली आहे.वरिल पाणपोईमुळे अनेक तहानलेल्या जिवांना मोठा आधार मिळणार असून वरिल उपक्रम राबविणारे भाजपाचे युवानेते कीर्ती ओसवाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी भाजप नेते  विजय तेंडूलकर , भाजपचे खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप खोपोली शहर सरचिटणीस  नेते ईश्वर,भाजप खोपोली शहर सरचिटणीस सुमीता महर्षी, शिंपी,जैन समाज ट्रस्टीचे अध्यक्ष हस्तीमल औसवाल , खोपोली शहर व्यापारी संघटना अध्यक्ष कांतीशेठ ओसवाल ,सांस्कृती सेल अध्यक्ष निशा दळवी तसेच बाजारपेठेतील व्यापारी व भाजपचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...