किशोर साळुंखे /खोपोली प्रतिनिधी
🛑 तहानलेल्यां जिवांना पाणपोईचा आधार..
🛑 वरिल स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..
🛑 खोपोली -- उन्हाळ्याची चाहूल लागली कि उन्हाचा पारा चढू लागतो तसतशी घशाला कोरड पडते तसतशी घशाला चार घोट पाण्याचे घ्यावशे वाटतात.आशा तहानलेल्या जिवांची तहान भागविण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष तथा खोपोली शहरातील यशस्वी युवा उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल संकल्पनेतून खोपोली शहरातील नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी शहरातील मुख्यबाजारपेठेत मोफत पाणपोईची व्येवस्था सूरु करण्यात आली.दि.15 मार्च रोजी भाजपाच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.खोपोली शहराचा विचार करता शहरातल्या मुख्यबाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते तसेच या ठीकाणी दर गुरुवारी आठवढ्याचा बाजार भरत असतो. शहरातील व ग्रामिण भागातून या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना बाटली बंद पाणी विकत घेवून पिणे सर्वांनाच शक्य नसल्यामुळे त्या प्रत्येक तहानलेल्यांना पाणी पाजणे हि आपली भारतीय संस्कृती असून पाण्यापासून वंचित राहू नये या प्रामाणिक उद्देशाने भाजपचे युवा नेते किर्ती ओसवाल यांनी पाणपोईची व्येवस्था सूरु केली आहे.वरिल पाणपोईमुळे अनेक तहानलेल्या जिवांना मोठा आधार मिळणार असून वरिल उपक्रम राबविणारे भाजपाचे युवानेते कीर्ती ओसवाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी भाजप नेते विजय तेंडूलकर , भाजपचे खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप खोपोली शहर सरचिटणीस नेते ईश्वर,भाजप खोपोली शहर सरचिटणीस सुमीता महर्षी, शिंपी,जैन समाज ट्रस्टीचे अध्यक्ष हस्तीमल औसवाल , खोपोली शहर व्यापारी संघटना अध्यक्ष कांतीशेठ ओसवाल ,सांस्कृती सेल अध्यक्ष निशा दळवी तसेच बाजारपेठेतील व्यापारी व भाजपचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment