राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफ - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा ; तातडीने अंमलबजाव
राष्टीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना
अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा
कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व
वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी
केली.
संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार, खासदार, स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत
असतात. सर्वस्व देत असतात. जीव धोक्यात घालत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या पत्रकाराला
त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी अशी पत्रकार संघटनांची मागणी होती .त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या.त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर
जर कुणा पत्रकाराचा आपघाती मृत्यू
झाला, तर त्याला पाच लाखाचा विमा
देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. तसेच ही सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे.
Comments
Post a Comment