Skip to main content

राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूर शेळके याच्या नावाची शिफारस करणार - श्रीरंग बारणे




स्वतःचा जीव धोक्यात घालून  चिमुकल्याचे प्राण वाचविणाऱ्या मयूरचा खासदार बारणे यांनी केला गौरव


 खोपोली (  किशोर साळुंखे) - 22 एप्रिल - प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचविला आहे. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा. राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. 



सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजन मध्ये पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर शेळके मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मधील नेरळ तलवडे ययेथील रहिवासी आहे.  कर्जत तहसील कार्यालयात खासदार बारणे यांनी मयूरचा आज (गुरुवारी) सत्कार केला. त्याच्या धाडसाचे, धैर्याचे कौतुक केले. त्याचे आई-वडील , कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सुवर्णा जोशी, आमदार महेंद्र थोरवे, प्रांताधिकारी वैशाली परदेशी,  तहसीलदार विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते.


खासदार बारणे म्हणाले, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना लहान मुलगा  तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी ट्रेन येत असल्याचे दिसताच मुलाचा अपघात होणार हे समजल्यावर क्षणाचा विलंब न लावता पॉइंटमन मयूर शेळकेने तत्परतेने धाव घेतली. ट्रेन येण्याआधी काही सेकंद मयूर यांनी मुलाला वाचवलं आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर चढले. 


आपला जीव धोक्यात घालून मयूरने मुलाचा प्राण वाचविला. त्याच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मयूरचा  सर्वांना अभिमान आहे. त्याचे मी कौतुक करतो. स्वतः रेल्वे खात्यात नोकरी करत असताना त्याने मुलाचा जीव वाचविला आहे.  शेळके परिवाराचे अभिनंदन करतो. त्याचे हे कार्य,   विचार आपल्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणा दायक आहेत. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा. राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे  खासदार  बारणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त