Skip to main content

खोपोली शहरात पाचशे वृक्ष वाटपाचा संकल्प करुन किर्ती ओसवाल यांनी केला वाढदिवस साजरा..



 खोपोली प्रतिनिधी-- किशोर साळुंके /                       खोपोली शहरातील भाजप रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष तथा शहरतील सुप्रसिद्ध उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते  किर्ती चंपालाल ओसवाल यांनी शहरातील बाजारपेठ व खोपोली पोलीस स्टेशन येथे  विविध जातींच्या वृक्षाच्यांचे  वाटप   खोपोली शहर बिजेपीच्या  पदाधीकार्यांच्या  प्रमुख उपस्थितीत साजरा करुन  शहरात एक वेगळा आदर्श ठेवला आहे..

सामाजिक कार्याची मनात  आवड  व तळमळ असणारे किर्ती ओसवाल यांनी यापूर्वी सुद्धा सर्वसामान्यं नागरिकांसाठी शहरात  मोफत चष्मे वाटप  तसेच भर उन्हाळ्यात लाँकडाउनच्या काळात  त्या तहानलेल्यांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत स्वताच्या खिशाला झळदेत स्वखर्चाने   थंडगार पाणपोई  , शाळकरी मुलांना मोफत मास्क वाटप करणे असे  अनेक  सामाजिक  उपक्रम निस्वार्थपणे राबवले आहेत..

कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे आँक्सिजन अभावी अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले..आँक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी ,प्राण वायूची गरज असल्याने  वृक्ष रोपन ही काळाची गरज  ओळखत ..आँक्सिजनची  कमतरता भरुन काढण्यासाठी वृक्ष रोपन गरजेचे असल्यामुळेच   वृक्ष वाटपाची संकल्पना केली  आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष वाटप करणे हाच केवळ उद्देश नसून या सर्व वृक्षाच्यांची निगा राखणे व त्यांचे संगोपन करणे हा देखील एक या  मागचा हेतू असल्याचे किर्ती ओसवाल यांनी यावेळी सांगितले...

खोपोली शहरातील भाजप रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष  यांच्या वाढदिवसा निमित्ताने ५००  वृक्षाच्यांचे वाटप करण्यात आले..तर या वृक्षाच्यांपेकी काही वृक्ष खोपोली पोलीस स्टेटशन  आवारात लागवडीसाठी देण्यात आली..या प्रसंगी खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल ,खोपोली शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पुनित तन्ना ,खोपोली शहर भाजपा शहर चिटणीस हेमंत नांदे..उत्तर रायगड कामगार आघाडीचे उपाध्यक्ष सुर्यकांत देशमुख ,भाजपचे हिम्मतराव मोरे,भाजप कार्यकर्त संतोष लोहार ,बिजेपी कार्यकर्ता ,पदाधीकारी व मोठ्या संखेने मित्रपरिवार यावेळी उपस्थितीत होता...

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...