Skip to main content

मनसेचे इंजिन धीम्या गतीने येऊन सुद्धा पाटलांच्या लोकप्रियतेमुळे अन तरुणाईच्या उत्साहामुळे ताटकळत का होईना पण सुसाट धावलं...!



 

कर्जत- : कर्जत प्रतिनिधी 



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच डिकसळ ते उमरोली स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा मनसेचे लोकप्रिय आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.आमदार साहेबांच्या लोकप्रियतेची प्रचिती आज सर्व पत्रकारांना दिसून आली मनसेचे इंजिन धीम्या गतीने का येत आहे हा प्रश्न पत्रकारांसकट कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांमध्ये पडला होता.तब्बल दोन अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आमदार राजू पाटील साहेबांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला दोन तास ताटकळत बसून सुद्धा जमलेल्या  कार्यकर्त्यांनमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला  (पॉपुलैरिटी) लोकप्रियता काय असते तरुणाई आशा लोकप्रियते मागे का धावते हे आज समजलं  मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आज कर्जतच्या भूमीत कार्यक्रमा निमित्त येत असल्याचे समजताच जागोजागी कार्यकर्त्यांनी व  हितचिंतकानी त्यांचा सत्कार केला लोकांनी एवढ्या मनोभावणेने केलेल्या सत्काराचा स्वीकार करता करता त्यांना कार्यक्रमाच्या सोहळ्याला यायला बराच वेळ लागला तरी प्रत्येकजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होता बऱ्याच तासांच्या नंतर आमदार साहेब आल्याने त्यांना बघण्यासाठी त्यांच्याशी हस्तांदोलन आणि सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांचा घोळका त्यांच्या भवती होता अखेर कार्यक्रम झाल्यावर आपण पुन्हा सेल्फी घेऊ अस सांगत पुढील कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंचाकडे प्रस्थान केले आमदार साहेब मंचावर येताच जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफक देऊन सत्कार केला तसेच कार्यकर्त्यांमधून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनीही आपले विचार मांडले त्यांनी स्पष्ट बोलून टाकले आपल्या इंजिनच्या धीम्या गतीने पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे आपण कार्यक्रमासाठी  खूपच उशीर केला असो ते आता आम्हाला सर्वांना आमदार साहेबांच्या लोकप्रियतेमुळे कळलं यानंतर आमदार राजू पाटील यांनीही आपले विचार उपस्थितांपुढे व्यक्त केले.तसेच मनसेचे इंजिन धीम्या गतीने का आले ते सांगून दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर कोरोना परिस्थिती, नैसर्गिक  वादळे व आपत्कालीन परिस्थिती मध्ये ज्या पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता वेळोवेळो समाजात घडणाऱ्या गोष्टी जनतेसमोर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या अशा पत्रकारांचा आमदार साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वच कर्जत-खालापूर मधील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

तसेच नव्याने सुरू होत असलेल्या डिजी ब्रेकिंग न्यूज पोर्टलचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...