कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी
)
कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते. दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई -पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशी शिन घालविण्यासाठ खास मुक्कामासाठी येतात. त्यामुळे ये-जा करणारे प्रवाशी या चारफाट्यावर असणाऱ्या हॉटेलामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. रस्त्याच्या कडेला हॉटेल , गाळे असल्याने गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. तर साहजिकच हॉटेलबाहेर गाड्या रस्त्यावर कसेबसे हि गाड्या पार्क करतात आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण होतो. त्यातून कर्कश हॉर्न वाजवीत ज्याला त्याला घाई असल्याचे दाखवीत असतात. आणि ट्रॅफिक हवालदार शिट्या वाजवीत वाहनचालकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी लेफ्ट-राईट हाताचे इशारे करत मार्ग मोकळा करून देतात. मात्र काही वाहनचालक जाणूनबुजून हॉटेलबाहेर पार्क केलेल्या गाड्या हटवित नाही आणि हॉटेल मालक फक्त बघ्याची भूमिका घेतो.
याच रस्त्यावरून कित्येक मंत्री येत असतात. कर्जत-चौक मध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांचे फार्महाऊन, जागा असल्याने येत असतात. त्यामुळे शिन घालविण्यासाठी अथवा पाहणी दौरा करतांना हि समस्या निदर्शनास पडत नाही का ? तर आमदार तर रोज याच रस्त्यावरून जात असतात त्यांना समस्या दिसूनही मोबाईलमध्ये लक्ष घालून कानाडोळा करीत आहे. जर एखाद्या रुग्णाला अचानक अन्य रुग्णालयात हलव्याचे म्हटल्यास या चारफाटा रस्त्यावरून बाहेर निघताना वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगविण्याची शक्यता असते तर याला जबाबदार कोण असणार ! सदरील बांधकामांवर कारवाई होण्यासाठी आणि ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकवित आहे. तर आमदारांनाहि पत्राद्वारे कळवूनही ते हात वर करीत आहे. त्यामुळे अखेर नारीशक्ती संघटनेने पुढाकर घेऊन जो पर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही तो पर्यंत उपोषणा माघार घेतले जाणार नाही.
----------------------------------------------
प्रतिक्रिया:-
"आम्हाला आश्वासन नको , ठोस कारवाई पाहिजे. त्याशिवाय उपोषण माघार नाही."
-----–-ज्योती जाधव
-------------------------------
" आतापर्यंत सर्व कार्यालयात पत्रव्यवहार केले आहे आणि मंत्रालयातून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतानाही कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही."
-------स्वीटी बार्शी
------------------------------------
Comments
Post a Comment