Skip to main content

कर्जत चार फाट्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी नारीशक्तीने छेडले बेमुदत उपोषण*

 

 


कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी



)

              कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे. 

          मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते.                      दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व  पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई -पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशी शिन घालविण्यासाठ खास मुक्कामासाठी येतात. त्यामुळे ये-जा करणारे प्रवाशी या चारफाट्यावर असणाऱ्या हॉटेलामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. रस्त्याच्या कडेला हॉटेल , गाळे असल्याने गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. तर साहजिकच हॉटेलबाहेर गाड्या रस्त्यावर कसेबसे हि गाड्या पार्क करतात आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण होतो. त्यातून कर्कश हॉर्न वाजवीत ज्याला त्याला घाई असल्याचे दाखवीत असतात. आणि ट्रॅफिक हवालदार शिट्या वाजवीत वाहनचालकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी लेफ्ट-राईट हाताचे इशारे करत मार्ग मोकळा करून देतात. मात्र काही वाहनचालक जाणूनबुजून हॉटेलबाहेर पार्क केलेल्या गाड्या हटवित नाही आणि हॉटेल मालक फक्त बघ्याची भूमिका घेतो. 

             याच रस्त्यावरून कित्येक मंत्री येत असतात. कर्जत-चौक मध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांचे फार्महाऊन, जागा असल्याने येत असतात. त्यामुळे शिन घालविण्यासाठी  अथवा पाहणी दौरा करतांना हि समस्या निदर्शनास पडत नाही का ? तर आमदार तर रोज याच रस्त्यावरून जात असतात त्यांना समस्या दिसूनही मोबाईलमध्ये लक्ष घालून कानाडोळा करीत आहे. जर एखाद्या रुग्णाला अचानक अन्य रुग्णालयात हलव्याचे म्हटल्यास या चारफाटा रस्त्यावरून बाहेर निघताना वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगविण्याची शक्यता असते तर याला जबाबदार कोण असणार ! सदरील बांधकामांवर कारवाई होण्यासाठी आणि ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकवित आहे. तर आमदारांनाहि पत्राद्वारे कळवूनही ते हात वर करीत आहे.  त्यामुळे अखेर नारीशक्ती संघटनेने पुढाकर घेऊन जो पर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही तो पर्यंत उपोषणा माघार घेतले जाणार नाही.

----------------------------------------------

प्रतिक्रिया:-

        "आम्हाला आश्वासन नको , ठोस कारवाई पाहिजे. त्याशिवाय उपोषण माघार नाही."

 -----–-ज्योती जाधव 

-------------------------------


         " आतापर्यंत सर्व कार्यालयात पत्रव्यवहार केले आहे आणि मंत्रालयातून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतानाही कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही."

-------स्वीटी बार्शी 

------------------------------------

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...