Skip to main content

कर्जत चार फाट्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी नारीशक्तीने छेडले बेमुदत उपोषण*

 

 


कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी



)

              कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे. 

          मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते.                      दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व  पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई -पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशी शिन घालविण्यासाठ खास मुक्कामासाठी येतात. त्यामुळे ये-जा करणारे प्रवाशी या चारफाट्यावर असणाऱ्या हॉटेलामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. रस्त्याच्या कडेला हॉटेल , गाळे असल्याने गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. तर साहजिकच हॉटेलबाहेर गाड्या रस्त्यावर कसेबसे हि गाड्या पार्क करतात आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण होतो. त्यातून कर्कश हॉर्न वाजवीत ज्याला त्याला घाई असल्याचे दाखवीत असतात. आणि ट्रॅफिक हवालदार शिट्या वाजवीत वाहनचालकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी लेफ्ट-राईट हाताचे इशारे करत मार्ग मोकळा करून देतात. मात्र काही वाहनचालक जाणूनबुजून हॉटेलबाहेर पार्क केलेल्या गाड्या हटवित नाही आणि हॉटेल मालक फक्त बघ्याची भूमिका घेतो. 

             याच रस्त्यावरून कित्येक मंत्री येत असतात. कर्जत-चौक मध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांचे फार्महाऊन, जागा असल्याने येत असतात. त्यामुळे शिन घालविण्यासाठी  अथवा पाहणी दौरा करतांना हि समस्या निदर्शनास पडत नाही का ? तर आमदार तर रोज याच रस्त्यावरून जात असतात त्यांना समस्या दिसूनही मोबाईलमध्ये लक्ष घालून कानाडोळा करीत आहे. जर एखाद्या रुग्णाला अचानक अन्य रुग्णालयात हलव्याचे म्हटल्यास या चारफाटा रस्त्यावरून बाहेर निघताना वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगविण्याची शक्यता असते तर याला जबाबदार कोण असणार ! सदरील बांधकामांवर कारवाई होण्यासाठी आणि ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकवित आहे. तर आमदारांनाहि पत्राद्वारे कळवूनही ते हात वर करीत आहे.  त्यामुळे अखेर नारीशक्ती संघटनेने पुढाकर घेऊन जो पर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही तो पर्यंत उपोषणा माघार घेतले जाणार नाही.

----------------------------------------------

प्रतिक्रिया:-

        "आम्हाला आश्वासन नको , ठोस कारवाई पाहिजे. त्याशिवाय उपोषण माघार नाही."

 -----–-ज्योती जाधव 

-------------------------------


         " आतापर्यंत सर्व कार्यालयात पत्रव्यवहार केले आहे आणि मंत्रालयातून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतानाही कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही."

-------स्वीटी बार्शी 

------------------------------------

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त