Skip to main content

कर्जत चार फाट्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी नारीशक्तीने छेडले बेमुदत उपोषण*

 

 


कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी



)

              कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे. 

          मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते.                      दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व  पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई -पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशी शिन घालविण्यासाठ खास मुक्कामासाठी येतात. त्यामुळे ये-जा करणारे प्रवाशी या चारफाट्यावर असणाऱ्या हॉटेलामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. रस्त्याच्या कडेला हॉटेल , गाळे असल्याने गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. तर साहजिकच हॉटेलबाहेर गाड्या रस्त्यावर कसेबसे हि गाड्या पार्क करतात आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण होतो. त्यातून कर्कश हॉर्न वाजवीत ज्याला त्याला घाई असल्याचे दाखवीत असतात. आणि ट्रॅफिक हवालदार शिट्या वाजवीत वाहनचालकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी लेफ्ट-राईट हाताचे इशारे करत मार्ग मोकळा करून देतात. मात्र काही वाहनचालक जाणूनबुजून हॉटेलबाहेर पार्क केलेल्या गाड्या हटवित नाही आणि हॉटेल मालक फक्त बघ्याची भूमिका घेतो. 

             याच रस्त्यावरून कित्येक मंत्री येत असतात. कर्जत-चौक मध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांचे फार्महाऊन, जागा असल्याने येत असतात. त्यामुळे शिन घालविण्यासाठी  अथवा पाहणी दौरा करतांना हि समस्या निदर्शनास पडत नाही का ? तर आमदार तर रोज याच रस्त्यावरून जात असतात त्यांना समस्या दिसूनही मोबाईलमध्ये लक्ष घालून कानाडोळा करीत आहे. जर एखाद्या रुग्णाला अचानक अन्य रुग्णालयात हलव्याचे म्हटल्यास या चारफाटा रस्त्यावरून बाहेर निघताना वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगविण्याची शक्यता असते तर याला जबाबदार कोण असणार ! सदरील बांधकामांवर कारवाई होण्यासाठी आणि ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकवित आहे. तर आमदारांनाहि पत्राद्वारे कळवूनही ते हात वर करीत आहे.  त्यामुळे अखेर नारीशक्ती संघटनेने पुढाकर घेऊन जो पर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही तो पर्यंत उपोषणा माघार घेतले जाणार नाही.

----------------------------------------------

प्रतिक्रिया:-

        "आम्हाला आश्वासन नको , ठोस कारवाई पाहिजे. त्याशिवाय उपोषण माघार नाही."

 -----–-ज्योती जाधव 

-------------------------------


         " आतापर्यंत सर्व कार्यालयात पत्रव्यवहार केले आहे आणि मंत्रालयातून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतानाही कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही."

-------स्वीटी बार्शी 

------------------------------------

Comments

Popular posts from this blog

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन व  पुरस्कार प्रधान सोहळा उत्साहात संपन्न

(खोपोली - किशोर साळुंके ) ) - रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील, यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले . वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक ...