खोपोली (किशोर साळुंके):खोपोली नगर परिषदेच्या माजी नगर सेविका उर्मिला रविंद्र देवकर यांच्या वतीने साईबाबा नगर मधिल नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळ असल्याने अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रोजंदारीचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत साईबाबा नगर येथील माजी नगरसेविका उर्मिला रविंद्र देवकर यांनी आपले पती रविंद्र देवकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन कोरोना काळात गोळया, औषधंचे वाटप, तसेच धान्य वाटप करून अनेक जणांना कोरोना काळात दिलासा दिला आणि आज पुन्हा सामाजिक अस्मिता जपत आपल्या प्रभागातील नागरिकांना छत्र्या वाटप करून एक आदर्श निर्माण करून दिला.
Comments
Post a Comment