Skip to main content

जेष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान.*.







*डिकसळ येथे आमदार  महेंद्र थोरवे यांच्या हस्ते वृक्षारोपण* 


*कर्जत :प्रतिनिधी*

जेष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या वतीने  वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.सदर कार्यक्रम तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी  कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


बैठकीचे जनक व पुज्यनिय दासबोध ग्रंथातून निरूपण करून डाॅ नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्माचे धडे देताना शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली.


त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.  तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांनी आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. काम, क्रोध,लोभ आणि मोक्ष ह्या सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य अर्पण केले.


अशा जेष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना स्मृतिदिनी अभिवादन करताना आमदार  महेंद्र थोरवे , यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नानासाहेबांचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रात नव्हे,जगांनी पाहिले आहे तिर्थरुप आप्पा साहेब व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  आजही बैठकीच्या माध्यमातून पुढे नेत आहे त्याचा वारसा दीपस्तंभासारखा दिशा देण्याचे काम करीत असून त्यांच्या अथांग कर्तुत्वाला सलाम म्हणून कर्जत नगरीत प्रवेश करताना  प्रवेशद्वारावर डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची कमान उभी करून तिचे भूमिपूजन दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या समाजकार्याचा वसा  व प्रबोधनाचे उल्लेखनीय  ऐतिहासिक कार्य करणारे नेतृत्व आहे.आजही प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात आजही लाखों श्रीसदस्य  निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करीत आहे समाजासाठी उल्लेखनीय कार्य असून समाज घडविण्याचे व युवा पिढीला दिशा देण्याचे  ईश्वरीय काम  बैठकीच्या माध्यमातून सुरू आहे  असेही आ.थोरवे यांनी सांगितले

 तीर्थरूप नानासाहेबांच्या अथांग कर्तृत्वाला आणि नेहमीच समाजकार्याचे भान राखणाऱ्या अखंड श्री सदस्य परिवाराला नमन करून जय जय रघुवीर समर्थ ! म्हणत तिर्थस्वरूप निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन केले.यावेळी आमदार  महेंद्र थोरवे यांच्या समवेत कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, उप सरपंच भारती पाटील, सदस्य प्रसाद भासे, मंगेश ठोंबरे,कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे, पत्रकार जयेश जाधव आणि मोठ्या प्रमाणात श्री सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चित्ते यांनी केले.सदर वृक्षारोपण कार्यक्रमात श्री सदस्यांनी तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे १५० झाडांची लागवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त