Skip to main content

पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह 18 कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ

खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि करारी वाटणारा प्रत्येकजण अंतर्मनातून भावुक असतो हे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर आणि इतर 18 कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभच्या वेळी दिसून आले. ओठात अडलेले शब्द, पाणावलेले डोळे आणि आठवणींची शिदोरी घेवून बदलीच्या ठिकाणी जाताना जड होणारी पावले असेच काहीसे चित्र खोपोली शहरातील कँपोलिन हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात होते. अवघ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात क्षीरसागर यांनी दाखवलेले कर्तुत्व, कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, कर्तव्यदक्षतेचे दिलेले धडे, बॅडमिंटन हॉलच्या निर्माणातून सर्वांच्या फिटनेसकडे दिलेले लक्ष आणि त्याच सोबत कर्मचारी वर्गाप्रती दाखवलेला विश्वास सर्वांच्या मनोगतातून दिसुन येत होता. खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते सर्वांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. खोपोली पोलीस ठाण्याच्या दैनंदिन घडामोडींसोबत इतर माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी यावेळी भूषण पाटिल, गुरूनाथ साठेलकर आणि खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. खोपोलीकरानी आणि कर्मचारी यांनी आपल्याला केलेले सहकार्य, दाखवलेला विश्वासच कर्तव्यापलीकडे जावून काम करण्यास प्रेरक ठरल्याचा आशय बदली झालेल्या पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी आपल्या भावपूर्ण भाषणात बोलून दाखवला. खोपोली पोलीस ठाण्यात काम करतांना गाठीशी जमवलेला अनुभव, सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा आपल्याला खुप पोषक ठरणार असल्याची खात्री सर्वजण देत होते. निरोप समारंभ त्याच सोबत सहभोजन अश्या आयोजनाची संकल्पना पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर यांची होती तर सूत्र संचालनातून जगदीश मारागजे यांनी कार्यक्रमाच्या आशयातील भावुकता वाढवली होती.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...