खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि करारी वाटणारा प्रत्येकजण अंतर्मनातून भावुक असतो हे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर आणि इतर 18 कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभच्या वेळी दिसून आले.
ओठात अडलेले शब्द, पाणावलेले डोळे आणि आठवणींची शिदोरी घेवून बदलीच्या ठिकाणी जाताना जड होणारी पावले असेच काहीसे चित्र खोपोली शहरातील कँपोलिन हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात होते.
अवघ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात क्षीरसागर यांनी दाखवलेले कर्तुत्व, कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, कर्तव्यदक्षतेचे दिलेले धडे, बॅडमिंटन हॉलच्या निर्माणातून सर्वांच्या फिटनेसकडे दिलेले लक्ष आणि त्याच सोबत कर्मचारी वर्गाप्रती दाखवलेला विश्वास सर्वांच्या मनोगतातून दिसुन येत होता. खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते सर्वांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
खोपोली पोलीस ठाण्याच्या दैनंदिन घडामोडींसोबत इतर माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी यावेळी भूषण पाटिल, गुरूनाथ साठेलकर आणि खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. खोपोलीकरानी आणि कर्मचारी यांनी आपल्याला केलेले सहकार्य, दाखवलेला विश्वासच कर्तव्यापलीकडे जावून काम करण्यास प्रेरक ठरल्याचा आशय बदली झालेल्या पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी आपल्या भावपूर्ण भाषणात बोलून दाखवला.
खोपोली पोलीस ठाण्यात काम करतांना गाठीशी जमवलेला अनुभव, सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा आपल्याला खुप पोषक ठरणार असल्याची खात्री सर्वजण देत होते. निरोप समारंभ त्याच सोबत सहभोजन अश्या आयोजनाची संकल्पना पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर यांची होती तर सूत्र संचालनातून जगदीश मारागजे यांनी कार्यक्रमाच्या आशयातील भावुकता वाढवली होती.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment