Skip to main content

स्थानिकांना कंपनीत नोकरीत प्रथम प्राधान्य द्या - शिवसेना अवजड वाहतूक सेनेची मागणी

खोपोली (प्रतिनिधी )
):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले. *शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* व *कार्यसम्राट आमदार मा.श्री.महेंद्रशेठ थोरवे* यांना निवेदन आले. त्यावेळी *नगरसेवक कु.संकेत भासे* *शिवसेनाअवजड वाहतूक सेना खालापूर तालुका अध्यक्ष कु.रुपेश संभाजी बैलमारे* व *उप तालुका संघटक कु.जयेशभाई पाटील* *तालुका उपाध्यक्ष मोहन अरमान, तालुका उपसचिव अभिजीत दरेकर तालुका उपाध्यक्ष शाहिद शेख खोपोली शहरसचिव हुसेन शेख* पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते......

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...