खोपोली (किशोर साळुंके ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले.
*शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* व *कार्यसम्राट आमदार मा.श्री.महेंद्रशेठ थोरवे* यांना निवेदन आले.
त्यावेळी *नगरसेवक कु.संकेत भासे* *शिवसेनाअवजड वाहतूक सेना खालापूर तालुका अध्यक्ष कु.रुपेश संभाजी बैलमारे* व *उप तालुका संघटक कु.जयेशभाई पाटील* *तालुका उपाध्यक्ष मोहन अरमान, तालुका उपसचिव अभिजीत दरेकर तालुका उपाध्यक्ष शाहिद शेख खोपोली शहरसचिव हुसेन शेख* पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते......
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment