खोपोली - खोपोली नगरीतील महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत सुरु असलेल्या केंद्रातील घाण पाणी पाताळगंगेत सोडल्याने पाणी प्रदूषित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
खोपोली नगरीतील परम पूज्य गगनगिरी आश्रमा समोर महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात मत्स्य विभागाचे केंद्र सुरु असून नव्याने लाखो रुपयांचा ठेका भरून एका व्यवसायिकाने येथे काही वर्षांसाठी काम घेतले आहे.
त्याच्या जागेतील सांडपानी /दुर्गंधीयुक्त पाणी /सडलेल्या माशाच्या अवयवांचे पाणी हे पाताळगंगेत सोडण्यात येत असून त्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. खोपोली पासून पेण पर्यंत या गंगेचा प्रवाह सुरु असून अनेक ठिकाणी या गंगेचे पाणी पिले जाते व आवश्यक कामासाठी वापरले जाते.
पण सध्या येथिल व्यवसायिकामुळे पाणी प्रदूषित होत असून संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी मागणी होत आहे..
....
संबंधित व्हिडीओ मध्ये सांडपानी पाताळगंगेत सोडताना live दिसत आहे.
............... ⭕️संपादक ⭕️
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment