खोपोली - खोपोली नगरीतील महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत सुरु असलेल्या केंद्रातील घाण पाणी पाताळगंगेत सोडल्याने पाणी प्रदूषित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
खोपोली नगरीतील परम पूज्य गगनगिरी आश्रमा समोर महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात मत्स्य विभागाचे केंद्र सुरु असून नव्याने लाखो रुपयांचा ठेका भरून एका व्यवसायिकाने येथे काही वर्षांसाठी काम घेतले आहे.
त्याच्या जागेतील सांडपानी /दुर्गंधीयुक्त पाणी /सडलेल्या माशाच्या अवयवांचे पाणी हे पाताळगंगेत सोडण्यात येत असून त्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. खोपोली पासून पेण पर्यंत या गंगेचा प्रवाह सुरु असून अनेक ठिकाणी या गंगेचे पाणी पिले जाते व आवश्यक कामासाठी वापरले जाते.
पण सध्या येथिल व्यवसायिकामुळे पाणी प्रदूषित होत असून संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी मागणी होत आहे..
....
संबंधित व्हिडीओ मध्ये सांडपानी पाताळगंगेत सोडताना live दिसत आहे.
............... ⭕️संपादक ⭕️
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment