Skip to main content

प्रभाग क्रमांक ३ मध्ये विकासकामांची बुलेट ट्रेन थांबता थांबेना.. कार्यसम्राट नगरसेवक किशोर पानसरेंच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ३ मधील मोहोनवाडीमध्ये २२ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन..

खोपोली -- (किशोर साळुंके )कोरोनामुळे शहरातील अनेक प्रभागामध्ये विकासकामे ठप्प असताना मात्र कोरोनाकाळात प्रभाग क्र.३ मधील नागरिकांना मुलभूत सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी कोरोना काळातही सातत्याने शासनदरबारी पाठपूरावा करुन आपल्या प्रभागातील मधील नागरिकांसाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त करुन देत केवळ भूमिपूजन करुन चमकोगिरी न करता भूमिपूजन करण्यात आलेल्या त्या सर्वच महत्वाची विकासकामे सूरु करुन आपल्या प्रभागातील विकासकामांची बुलेट ट्रेन सूरूच ठेवण्यात पानसरे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. .१० सप्टेंबर रोजी मोहोनवाडी मधील युवा उद्योजक तथा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग ३ मधील मोहोनवाडी गावासाठी तब्बल २२ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत मोहोनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपंन्न झाला.जून महिन्यांपासून नाँनस्टाँप पडणार्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरावस्था होवून येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण दूर करण्यासाठी पानसरे यांनी भरीव निधी उपलब्ध करुन देत मोहोनवाडी येथील नागरिकांची सदर अडचण लवकरच गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रेटीकरणाच्या कामाला सूरवात होणार असून . नागरिकांची वरिल अडचण पानसरे यांच्या प्रयत्नाने दूर होणार आहे.त्याबद्दल कार्यसम्राट समजले जाणारे नगरसेवक पानसरे यांचे येथील नागरिकांनी आभार मानले. कोरोना काळातील गेल्या दोन वर्षांमध्ये पानसरे यांनी शहरातील इतर प्रभागांपेक्षा आपल्या प्रभागासाठी सर्वाधीक निधी उपलब्ध करुन देत अनेक मोठमोठी महत्वांची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी ठरले आहेत.या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मुंडे यांचा केक कापून वाढदिवस, साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अकाश सताने ,प्रशांत तांबे,आनंद मर्चंडे ,दिनेश मोरे,सरफराज पाटील ,रोहीत, आनंद चव्हाण , सुनिल चव्हाण ,आदर्श बेंबडे, सनिज मांडलेकर , रुपेश गायकवाड ,ठेकेदार भरतशेठ वाघुले,आदी उपस्थितीत होते

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...