‘
खोपोली :(किशोर साळुंके )- देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शिवशाही व्यापारी संघाने या बंदला पाठिंबा दिला आहे. शिवशाही व्यापारी संघाचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन युवराज दाखले यांनी केलं आहे.
युवराज दाखले यांनी खोपोली या ठिकाणी हॉटेल यादगार या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं दाखले यांनी सांगितलं. यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव,रायगड जिल्हाअध्यक्ष शेखर छोञे,खलापुर तालुका अध्यक्ष तथा मा सरपंच आनिल म्हामुनकर,खलापुर तालुका संघटक आमित जाधव,शिवशाही व्यापारी संघ खपोली शहर कायाॕध्यक्ष तौफीक करजीकर,रायगड जिल्हा संघटक भाऊ सनस,स्वयंमसेवक शाहीद शेख उपस्थित होते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment