Skip to main content

भाजप पदाधिकारी यांनी घेतली नवनियुक्त अधिकाऱ्यांची भेट.

खोपोली..(किशोर साळुंके ) खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांची भेठ भाजप पदाधिकारी यांनी घेतली. खालापूर तालुका व खोपोली शहरा मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याचे स्वागत केले व सुभेच्छा दिल्या. या वेळी झालेली चर्चे मध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणाऱ्या अडचणीचे मुद्दे राहुल जाधव यांनी मांडले. तसेच या साठी कॅम्पचे आयोजन करावे असे श्रीकांत पुरी यांनी सांगितले. मुख्याधिकारी अनुप दुरे यांना सुभाष नगरचा रास्ता (रेल्वे गेट/ मस्कॉ गेट ते जाधव मामा यांचा घरापरियांतचा रास्ता- जाधव मामा चौक) संदर्भात राहुल जाधव यांनी माहिती दिली. ग्रामस्थांनी नवी रस्त्या साठी केलेले विरोध, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी 50 वर्ष जुन्या रस्त्या डांबरीकरण केले आहॆ तसेच हा रस्ता सार्वजनीक रास्ता म्हणून घोषित करण्यात यावा या साठी खोपोली नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मंजूर करण्यात आलेला ठराव. सुभाष नगर ग्रामस्थांनी या रस्त्याला खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग असे नामकरण करण्यात यावे या मागणी ची माहीत दिली. सुभाष नगर येथील स्वच्छता व आरोग्य संदर्भात थोडक्या चर्चा करण्यात आली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी यांची शहरातील नगर परिषदेचे रखडलेल्या प्रकल्प व भविष्यातील उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. शहरातील बाजारपेठ, समाज मंदिर रोड येथील समस्या सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी मांडले. वृक्षारोपण व यांचे संगोपन कार्यक्रम, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमाचा माध्यमातून बांधलेल्या छोटे बंधारे बाबत माहिती चिटणीस गोपाळ बावस्कर आणि संजय म्हात्रे यांनी दिली. खोपोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचा बरोबर विविध विषया संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या प्रमुख अधिकाऱ्यांचे स्वागत भाजपचे युवा नेते शक्ती केंद्र प्रमुख *राहुल जाधव*, जिल्हा उपाध्यक्ष *श्रीकांत पुरी*, खोपोली शहर सरचिटणीस *ईश्वर शिंपी*, चिटणीस *गोपाळ बावस्कर*, शक्ती केंद्र प्रमुख *संजय म्हात्रे*, *दिलीप देशमुख*, भाजप वैदयकीय सेल खोपोली शहर सह-संयोजक *विकास खुरपुडे* यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...