कर्जत: जयेश जाधव
कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती संदीप भोईर यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या सरपंचाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .त्यांचा झालेला सन्मान म्हणजे भविष्यात त्यांना गरुड भरारी घेण्यास प्रेरणादायी ठरणार आहे शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून थेट नागरिकांमधून निवडून आलेल्या सरपंच आरती संदीप भोईर यांच्या निवडीला अडीच वर्षात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला त्याच्या कार्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीला २०१८-१९ वर्षात आर आर पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार त्यांना १४ फेब्रुवारी २०२०रोजी प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना 'उत्कृष्ट सरपंच' म्हणून गौरविण्यात आले आहे .याशिवाय कोरोना काळात न डगमगता नागरिकांची सुरक्षा जपत सुरक्षिततेची साधने व शासनाकडून आलेले आदेश पाळत कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपले घरदार, संसार सांभाळून अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात त्यांच्या कार्याचा असा सत्कार म्हणजे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वेगळेच प्रोत्साहन असून हा पुरस्कार म्हणजे माझ्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि त्यांचे आशीर्वाद असल्याचे मत सरपंच आरती संदीप भोईर यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सामाजिक ,राजकीय , क्रिडा , सांस्कृतिक क्षेत्रातून मान्यवर मंडळींकडून सरपंच आरती भोईर यांचे अभिनंदन होत आहे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment