Skip to main content

खालापुरात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन : वेध सह्याद्री मार्फत स्तुत्य उपक्रम*

खालापूर : खालापूर शहरातील प्राचीन असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होत्या. खालापूर तालुक्याला ऐतिहासिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून आज खालापूराकडे पहिले जाते. अनेक परिसरात आज विविध प्रकारचे ऐतिहासिक अवशेष सापडताना पहायला मिळत आहेत. ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या वास्तू जतन करणे हे आपले कर्तव्य असून पुढील पीढीसाठी या अवशेषांचे जतन होणे गरजेचे असल्याची संकल्पना घेत वेध सह्याद्री तर्फे खालापूरत सोमेश्वर मंदीर परिसरात संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमे दरम्यान मातीत गाडले गेलेल्या समाधी शिळा, नंदी यांना जमिनीतून बाहेर काढत मोकळे करून स्वच्छता करण्यात आली तसेच शिळा व वीरगळ यांची स्वच्छता करण्यात आली. विरगळीला इतिहास महत्वाचे स्थान असून जो वीरपुरूष जमीन, पशु अथवा आपली स्त्री यांच्या सौरक्षणासाठी लढत असत त्यांच्या मृत्यू नंतर वीरगळ बनवण्यात येत होती. या विरघळी खालापूर परिसरात सापडत आहेत या वरून ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या परीसराचे महत्व लक्षात येते. मोहिमे दरम्यान स्थानिक रहिवासी व मंदिर परिसराची देखरेख करणारे डॉ. आठवले तसेच इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मोहीम यशस्वी करण्यासाठी वेध सह्याद्रीच्या सर्व सदस्यांनी यावेळी मेहनत घेत पुन्हा एकदा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंदिर परिसरात अजूनही काही अवशेष असून विष्णू, गणपती तसेच प्राचीन देवांच्या मुर्त्या सुद्धा दुर्लक्षित आहेत हे सर्व अवशेष संवर्धन होई पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे वेध सह्याद्री मार्फत सांगण्यात आले आहे.https://youtu.be/aKtoPRjY348 उपस्थित डॉ.आठवले व इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांनी वेध सह्याद्री तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमाला शुभेच्छा देत सहभागी सदस्यांचे कौतुक केले मोहिमेत मोहीम प्रमुख म्हणून प्रफुल्ल किलांजे यांनी उत्तम रित्या नियोजन केल्याचे पहायला मिळाले

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त