खोपोली -(किशोर साळुंके)- खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा संशय आल्याने त्या वाहनातील इसमांची चौकशी केली असता एकूण सहा इसमांपैकी पाच जणांनी एकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे उघड होताच त्या पाच जणांच्या मुसक्या आवळून अटक करून अपहरण कर्त्याची सुटका करण्यात आली.
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दिनांक ३०सप्टेंबर रोजी रात्री खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत असताना MH-04-CT-2597 क्रमांकाची अल्टो कार आली असता तिच्या मागील नंबर प्लेट वर चिक्खल लावला असल्याने पोलिसांना संशय आला व त्यांनी आतील इसमांची चौकशी केली असता त्या गाडीत सहा इसम होते. सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. पण त्यातील एकाने पोलीस अधिकाऱ्यांना 'मला वाचवा ' अशी विनंती केली असता पोलीस सतर्क झाले आणि त्या सर्वांना खोपोली पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता यातील पाच जण,वामन मारुती शिंदे (३९), योगेंद्र प्रसाद (२५), दिलीप पासवान (३२), धुरपचंद्र यादव (33), संदीप सोनावणे (३५)सर्व राहणार अंबरनाथ, यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथिल दिगंबर इंदलसिंग चितोडिया याचे अपहरण करून त्यास दोन दिवस अपहरण करून अंबरनाथ येथे डांबून ठेवुन त्याच्या घरचांकडे २५,००,०००रुपये मागणी केली असल्याचे समजले.
खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र. क्र.७३८/२०२१, भादवीसंक.३६४(अ),३८६या प्रमाणे अपहरण व खंडणी मागणे या गुन्ह्याप्रमाणे नोंद केल्याची माहिती मिळाली. सदर पोलिसांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन सदर आरोपिंचा ताबा घेऊन अपहरण झालेल्या तरुणाला सुखरूप ताब्यात दिले आणि खोपोली पोलिसांचे खास अभिनंदन केले.
एका अपहरणं झालेल्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ,स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून त्यांना योग्य ते पारितोषिक देण्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले.
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
Comments
Post a Comment