Skip to main content

खोपोलीतील दत्त मंदिरातील पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न अनिल सानप यांनी स्वनियोजनाने बांधला लोखंडी पुल

खोपोली -(बातमीदार)- खोपोली शहरातील नामकींत झेनिथ कारखान्यातील कामगार वर्गानी व झेनिथ परिसरातील भक्तांनी 1970 साली सेवागिरी आश्रम दत्त मंदीराची निर्मिती केली. या मंदिराची निर्मिती होत असताना मंदिरात जाण्यासाठी नाल्यावर पुल बांधण्यात आला होता, परंतु गेल्या अनेक वर्षात या पुलाची दुरुस्ती न झाल्याने हा पुल धोकादायक अवस्थेत उभा होता. या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे असताना ही समस्या ओळखून खोपोली शिवसेना शहरप्रमुख अनिल सानप यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने आजोबा - आजी - मावशी स्मरणार्थ लोखंडी पुल बांधल्याने या पुलाचे उघ्दाटन 2 अॉक्टोबर रोजी जेष्ठ मंडळीच्या हस्ते पार पडला असून अनिल सानप याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरावरून कौतुक केले आहे. खोपोली शहरातील झेनिथ परिसर हा निसर्ग सौदंर्याने नटलेला परिसर असून या परिसरात घनदाट झाडी असल्याने येथील वातावरणात सर्वाना आल्हाददायक वाटत असताना याच परिसरात झेनिथ कामगार वर्ग व भक्त गणांनी 1970 साली सेवागिरी आश्रम दत्त मंदीर बांधले, हे मंदीर बांधत असताना भक्तांची जे - जा करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून नाल्यावर पुल बांधण्यात आला होता. परंतु निर्मितीपासून पुलाची दुरुस्ती न झाल्याने पुल पूर्णपणे मोडकलीस आला होता. हा पुल भक्तांसह पर्यटकांना धोक्याची घंटा देत असताना या पुलाची नादुरुस्त अवस्था लक्षात घेत खोपोली शिवसेना शहरप्रमुख अनिल सानप यांनी पुढाकार घेत व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने आजोबा रघुनाथ तात्याबा सानप, आजी रमाबाई रघुनाथ सानप, मावशी सुमन काशिनाथ आंधले याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने लोखंडी पुल बांधून दिल्याने या पुलाचे उघ्दाटन 2 आक्टोबर रोजी जेष्ठ मंडळी हस्ते पार पडला व सदर पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर पत्रकारांच्या वतीने सचिन यादव यांनी श्रीफळ वाढवून अनिल सानप यांना शुभेच्छा दिल्या.. सर्वानी अनिल सानप यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करीत सानप याना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपशहरप्रमुख शिवसेना अनिल पुंडलिक सानप, अनंत गायकर, अनिलकुमार रानडे, बाळु इमानदार, दत्तात्रेय दळवी, संजय म्हात्रे, जयवंत वाघ, मिलिंद भोईर, सिध्देश सुळे, पुंडलिक सानप, मुंकुद बेंबडे, कान्हु निरघुडे, मंगळ उघडे, निलेश मोडवे, भाऊ ढुमणे, वसंत जोशी, संतोष जाधव, सुदाम उघडे, वनाजी जाधव, गोविंद मेंगाळ, पांडुरंग हिंदोळे, चंद्रकांत जाधव, अजय जाधव, दिपक दोरे, सागर उघडे, चंद्रकांत उघडे, भाजपा सोशिल मिडीयाचे राहूल जाधव, सरचिटणीस गोपाळ बावस्कर आदीप्रमुखासह झेनिथ परिसरातील ग्रामस्थ, श्री दत्त मंदीराचे सदस्य व भक्तगण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...