खोपोली - (प्रतिनिधी ) :
संपूर्ण महाराष्ट्रात अन्याया विरोधात आवाज उठविणारी लढाऊ असणाऱ्या बहुजन युथ पँथर या संघटनेच्या खोपोली शहर अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी किशोर साळुंके यांची नियुक्ती केली.
संपूर्ण महाराष्ट्रभरात कोणावरही अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देणे, विविध आंदोलन करून वेळेला रस्त्यावर उतरून सामाजिक समस्या सोडविणासाठी भाईसाहेब जाधव यांनी बहुजन युथ पँथर ही लढाऊ संघटना स्थापन केली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सुशीलभाई जाधव यांनी स्वीकारल्यावर काम करून दाखविले. संघटना वाढीसाठी अथक परिश्रम घेतले. आज खोपोली शहरात नागरिकारण वाढत आहे. इथेही अनेक सामाजिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी खोपोली नगरीत ही संघटना कार्यरीत झाली असून खोपोली मधिल सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकारितेतून सामाजिक प्रश्न सोडविण्यात भर देणारे किशोर साळुंके यांची खोपोली शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
छोटेखानी सभेत बहुजन युथ पँथर चे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष सुशीलभाई जाधव यांनी नियुक्ती पत्र देऊन खोपोली शहर अध्यक्षपदी किशोर साळुंके यांची नियुक्ती केली.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
अभिनंदन साहेब
ReplyDelete