खोपोली -(किशोर साळुंके ) :
खोपोली परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी सिटी बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून सिटी बस बंद करण्यात आली होती, कोरोना आटोक्यात आल्यानंतर देखील आज पर्यंत खोपोली सिटी बस अद्याप चालू करण्यात आलेले नाही. ती सुरु करण्याची मागणीआर पी आय ने खोनपा कडे केली आहे.
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रेल्वे,विमान,बस सेवा सुरू झालेले आहे तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मागणी वरून खोपोली शहर सिटी बस 15 दिवसाच्या आत चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी व शिवशाही व्यापारी संघ, तथ्य योद्धा, सामाजिक संघटना, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी समाजसेवक पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन खोपोली नगर परिषदेवर जन आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोकण प्रदेशाध्यक्ष मातंग आघाडी तुषार कांबळे यांनी खोपोली नगर परिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment