कर्जत -(संकेत घेवारे ) -
संपूर्ण भारतातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठा बांधवानी एकत्र येण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सुरु केलेल्या जनसंपर्क यात्रेचे जंगी स्वागत पळसदरी येथे करण्यात आले.
सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण देशातच नव्हे तर परराष्ट्रातील मराठ्यांनी आंदोलने केली. शेकडो मोर्चे निघाले, अनेकांनी आत्म बलिदान केले, पण आरक्षण मिळाले नाही.
पुन्हा सर्व समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी रेटून धरण्यासाठी आणि सरकारने हे आरक्षण मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी जनसंपर्क अभियान यात्रा सुरु केली असून रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे या यात्रेचे तुतारीच्या गजारात जंगी स्वागत करण्यात आले.
कर्जत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात छत्रपती संभाजी महाराज यांचे मठाच्या वतीने मठाधीपती यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्र टाईम्स 25NEWS चे सह संपादक अभिजित दरेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment