Skip to main content

गोदरेज आणि बॉईस मँन्यु कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व जपत खालापूर पोलिसांना दिली आपत्ती व्यवस्थापनासाठी सामुग्री

खोपोली (किशोर साळुंके ):- खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी परीसरात घडणारे अपघात आणि त्यावेळीं मदत करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून काही अत्यावश्यक साहित्य आपल्या यंत्रणेकडे असावे आणि ते उपलब्ध व्हावे यासाठी गोदरेज आणि बॉईस मँन्यु कंपनीकडे प्रस्ताव ठेवला होता. गोदरेज कंपनीने आपल्या सीएसआर फंडातुन आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक समुग्रीचा संच 6 अक्टो 2021 रोजी खालापूर येथे आयोजित कार्यक्रमात खालापूरचे तहसिलदार अयुब तांबोली, पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्याकडे गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण अनंता दळवी यांनी सामुग्री हस्तांतरित केली. पोलीस आणि महसूल प्रशासनाला नेहमीच मदत करणाऱ्या अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,सहजसेवा फाऊंडेशन, यशवंती हायकर्स सारख्या संस्थाच्या कार्यपद्धतीचे यावेळी कौतुक करण्यातआले. यावेळी तहसिलदार अयुब तांबोळी, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण, अनंता दळवी, अनुभव ट्रस्ट अध्यक्ष दिलीप आखाडे, उप पोलिस निरिक्षक बजरंग राजपूत, सहाय्यक पोलिस निरिक्षक शेखर लव्हे, गणेश कराड व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात तहीलदार अयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, गोदरेज व्यवस्थापनाचे राजेंद्र पाशिलकर आणि तानाजी चव्हाण,अनुभव ट्रस्ट अध्यक्ष दिलीप आखाडे, अपघात टीमचे गुरूनाथ साठेलकर यांनी आपले विचार मांडले. जगदीश मारगजे यांनी सूत्र संचालन तर उप पोलिस निरिक्षक बजरंग राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले. खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि बॉईस मँन्यु.कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने कारखानदारी करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने करते, CSR फंडातून असंख्य लोकहिताचे उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. त्यात या स्त्युत उपक्रमाची भर पडलीआहे. सर्वच स्तरावरून यासाठी गोदरेज व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे. अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडे आपत्ती प्रसंगी वापरण्यासाठी अत्याधुनिक बोट, दुर्बीण, ग्रो प्रो कँमेरा, सुरक्षा जँकेट, हार्नेस, स्ट्रेचर, स्कँनर एलईडी सर्च लाईट इत्यादी सामुग्रीपैकी काही सामुग्री पोलीस यंत्रणेने हस्तांतरीत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितू सकपाळ, अनिल मरागजे, अशोक मरागजे, अपघातग्रस्त टिमचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, राजेश पारठे, हनिफ कर्जीकर अमोल ठकेकर, अमित गुजरे, भक्ती साठेलकर, समाधान दिसले, विकी भालेराव, दिनेश पाटील, सारिका सावंत, अर्जून कदम, फरहान कर्जीकर, नवज्योत पिंगळे, यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील, सामाजिक संस्थांचे प्रमुख, राजकीय नेते तसेच पत्रकार मंडळी कार्यक्रमात सहभागी झाली होती. आपत्ती काळात मदत करण्यासाठी गोदरेज कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व जपत केलेली मदत खरोखर उल्लेखनीय आहे. अशा कंपन्या संस्था आणि व्यक्तींचा आपल्याला आदर आहे. : अयुब तांबोळी (तहसिलदार खालापूर) आमच्या कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून खालापूर पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन समुग्री उपलब्ध करून दिली आहे. त्या सामुग्रीच्या वापरातून आपत्ती काळात मदतीसाठी मोठा फायदा होईल, तसेच कंपनी याही पुढे अशीच सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घेईल. . : राजेंद्र पाशिलकर (व्यवस्थापक गोदरे

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...