Skip to main content

बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके यांच्या वतीने ७२ व्या संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाटप .

बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके यांच्या वतीने ७२ व्या संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाटप .
. खोपोली ( प्रतिनिधी) -- आज दि,२६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा होत असाताना ,खोपोली शहरातील विविध ठिकाणी बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांच्या वतीने संविधानाच्या प्रास्तविकेच्या प्रतीमा वाटप करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोहेंबर १९४९ रोजी भारतासाठी निर्माण केलेले संविधान राष्ट्रपती डां. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपुर्द करुन देशाला अर्पण करण्यात आले.यानंतर सदर संविधानाची अंमल बजावणी २६ जानेवारी 1950 रोजी होवून भारताचा संपूर्ण संवैधानिक कारभार या संविधानानूसार झाला.२६ नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी भारत देशाला वरिल संविधान दिल्याने त्याचा गौरव दिन आजच्या दिनी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्ताने खोपोली शहरातील बहुजन युथ पँथरचे निडर समजले जाणारे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी युथ पँथर जिल्हाध्यक्ष सुशिलभाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरातील सिद्धार्थनगर येथील डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर , विहारी येथील नालंदा बुद्ध विहार ,खोपोली मंडळ अधिकारी कार्यालय व खोपोली नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेच्या प्रतीमा भेट दिल्या.सर्व ठिकाणी संविधान प्रास्तविकेच्या . प्रतिमा भेट दिल्या .खोपोली शहरात वरिल स्तुत्य उपक्रमांची दखल घेत बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष यांचे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...