खोपोली : (आदर्श बेंबडे) : खालापूर तालुक्यातील लोहप गावानजीक असणाऱ्या आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून निघणाऱ्या काळ्या केमिकल युक्त पावडर मुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून निसर्गाचीही हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खालापूर तालुका तसा औद्योगीकरणात अग्रेसर आहे. साधारण पाचशेच्या आसपास येथे छोटे मोठे कारखाने आहेत. अशाच कारखान्यांपैकी एक असणारा लोहप गावा लागतचा मौजे तळवली येथिल आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कं.यात केमिकल युक्त काम चालते. यामुळे या कारखाण्यातून काळ्या रंगाची केमिकल युक्त पावडर मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. या पावडर ला 'चारकोळ 'म्हणुन संबोधले जाते. ही पावडर हवेतून आसपासच्या गावांमध्ये पसारते. यामुळे येथिल नागरिकांना श्वसनाचे व चर्मरोगाचे विविध आजार जडत चालले आहेत. दमा, खोकला, टीबी यासारख्या भीषण आजरांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच निसर्गाची हानीही होत आहे. जमिनीत त्या पावडर मुळे केमिकल पसरत आहे. झाडा, झुडूपांवर त्याचा असर होत आहे. मूकजनावर पाला पाचोळा खाताना ही पावडर त्यांच्या पोटात जाऊन भीषण आजार होण्याची शक्यता आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ मंडळ लोहप खालापूर यांच्या वतीने या कंपनीतून निघणारी ती पावडर त्वरित बंद व्हावी व कंपनीवर कडक शासन करावे यासाठी अतुल शेलार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा अधीक्षक रायगड, खालापूर तहसीलदार, रसायनी पोलीस ठाणे, आमदार उरण यांस लेखी तक्रार अर्ज दिले आहेत.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment