खोपोली : (आदर्श बेंबडे) : खालापूर तालुक्यातील लोहप गावानजीक असणाऱ्या आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून निघणाऱ्या काळ्या केमिकल युक्त पावडर मुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून निसर्गाचीही हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खालापूर तालुका तसा औद्योगीकरणात अग्रेसर आहे. साधारण पाचशेच्या आसपास येथे छोटे मोठे कारखाने आहेत. अशाच कारखान्यांपैकी एक असणारा लोहप गावा लागतचा मौजे तळवली येथिल आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कं.यात केमिकल युक्त काम चालते. यामुळे या कारखाण्यातून काळ्या रंगाची केमिकल युक्त पावडर मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. या पावडर ला 'चारकोळ 'म्हणुन संबोधले जाते. ही पावडर हवेतून आसपासच्या गावांमध्ये पसारते. यामुळे येथिल नागरिकांना श्वसनाचे व चर्मरोगाचे विविध आजार जडत चालले आहेत. दमा, खोकला, टीबी यासारख्या भीषण आजरांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच निसर्गाची हानीही होत आहे. जमिनीत त्या पावडर मुळे केमिकल पसरत आहे. झाडा, झुडूपांवर त्याचा असर होत आहे. मूकजनावर पाला पाचोळा खाताना ही पावडर त्यांच्या पोटात जाऊन भीषण आजार होण्याची शक्यता आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ मंडळ लोहप खालापूर यांच्या वतीने या कंपनीतून निघणारी ती पावडर त्वरित बंद व्हावी व कंपनीवर कडक शासन करावे यासाठी अतुल शेलार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा अधीक्षक रायगड, खालापूर तहसीलदार, रसायनी पोलीस ठाणे, आमदार उरण यांस लेखी तक्रार अर्ज दिले आहेत.
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
Comments
Post a Comment