Skip to main content

खोपोलीमध्ये केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजने अंतर्गत कुस्ती केंद्राचे उद्घाटन.

खोपोली :किशोर साळुंके रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संचलित "खेलो इंडिया" या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत "जिल्हा कुस्ती केंद्राचे" उद्घाटन रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या अवघ्या तीन कुस्ती केंद्रात खोपोलीच्या स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती केंद्र मंजूर करून कुस्तीगिरांचे भवितव्य घडविण्याचा संकल्प या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केला गेला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांचे स्मरण करून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांच्याच नावे निर्माण झालेल्या संकुलात कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्याचा अपूर्व योग आल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगून या योजने अंतर्गत जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. राज्य क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खोपोली शहरातील कुस्तीगीरांची संख्या पाहता, याच ठिकाणी कुस्ती केंद्र असावे असा आग्रह होता त्या नुसार प्रशासकीय पूर्तता करून हे केंद्र मंजूर झाल्याने येथून देशपातळीवर चांगले कुस्तीपटू निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून खोपोली शहराचे नाव या क्षेत्रात अधोरेखित होईल असा विश्वास व्यक्त केला. खोपोलीच्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी या कुस्ती केंद्रासाठी नगरपालिकेकडून शक्य तितकी मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. नगराध्यक्षा सुमन ताई औसरमल यांनी खेलो इंडिया योजने अंतर्गत मंजूर झालेले कुस्ती केंद्र म्हणजे खोपोलीचा सन्मान असल्याचे सांगत या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाधिक खेळाडूंना प्राधान्य मिळेल याकडे आपलाही कटाक्ष असेल असे सांगत, सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव जगदीश महाराजचे आणि आभार प्रदर्शन कुस्ती प्रशिक्षक राजू कुंभार यांनी केले. या कार्यक्रमासाठी खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर, सुभाष घासे, क्रीडा प्रशिक्षक डॉ जयवंत माने, राजाबापू सगळगीळे, पद्माकर गायकवाड, हेमंत खाडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते. या सोहळ्यात बाल आणि युवा कुस्तीगीर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवली होती.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...