Skip to main content

कसईशेत येथे हनुमान मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न

परळी : मंगेश वाघमारे सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील कसईशेत ठाकुरवाडी येथे रायगड भुषण ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमंत राय यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत प्राणप्रतिष्ठा महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवार दिनांक २५ /१२ / २०२१ रोजी वास्तु पुजा, नवग्रह पूजन, होम हवन विधी, हरिपाठ, जलावास, धान्यवास असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा तर रात्री ९ नंतर जागर भजन करण्यात आले. रविवार दिनांक २६ / १२ / २०२१ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळशारोहन, सत्यनारायणाची महापूजा, सामुदायिक हरिपाठ आणि रात्री ९ वाजता गुरुवर्य ह.भ.प. श्री. रामदास महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाला महाप्रसाद हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई रमेश पाठारे व संदेश सखाराम तवले यांच्या वतीने देण्यात आला. दिनांक २६ /१२ / २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना दत्तात्रेय सकपाळ यांनी कसईशेत ग्रामस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कसईशेत ग्रामस्थ हे मनमिळाऊ व संकटात धावून जाणारे आहेत. त्यांनी अतिशय परिश्रमाने हनुमानाचे मंदिर उभारले असून समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे. सम्यक क्रांती विचार मंचचे अध्यक्ष तथा पत्रकार मंगेश वाघमारे यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ठाकूर समाज हा प्रामाणिक, कष्टाळू आणि संघटनेने जगणारा समाज आहे. कितीही राजकारण झाले, वाद झाला तरी देखील ठाकुर समाज हा एकत्र बसूनच निर्णय घेतो. गावकीच्या निर्णयाच्या विरोधात कुणीही जात नसल्यामुळे ठाकूर समाजाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. ठाकूर समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून व्यसनापासूनही हा समाज दूर जाताना दिसत आहे. रायगड भूषण रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाची वाढ होत असून आदिवासी समाज देखील वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालताना दिसत आहे. ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांनी हनुमान मंदिराच्या मंदिरासाठी मोफत जागा उपलब्ध करून देणाऱ्या हिरू बामा शिद यांचा सत्कार करून आजच्या युगात फूटभर जागेसाठी भांडणाऱ्या लोकांमध्ये हिरु बामा शिद यांनी फार मोठे दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. अशी त्यागी माणसे फार कमी प्रमाणात आढळतात. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई पाठारे यांनी सांगितले की, कसईशेत ग्रामस्थांनी एकोपा दाखून हनुमानाचे मंदिर उभारले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कार्यक्रमाला पीएसआय राम पवार, मारुती पांगारे, उपसरपंच पंकज पाठारे, परळी ग्रामपंचायतीचे सदस्य महेश ठाकूर, रमेश विष्णू पाठारे, दत्तात्रय सपकाळ, माजी सरपंच शंकर कडू, माजी उपसरपंच अनंत भोसले, जगन्नाथ पाठारे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घोंगे, विठ्ठल सिंदकर, माजी सरपंच झिमा कोकरे, शाहीर दामोदर शिद, धावू हिरवा, काशिनाथ पाठारे, रमेश घोंगे, संदेश तवले यांच्यासह पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन हिरु वाघमारे, रमेश कानू वाघमारे, दिनकर सोमा शिद, मारुती हाशा निरगुडा, ताई किसन वाघमारे, इंदु गोमा ठोंबरे व कसईशेत ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...