Skip to main content

कसईशेत येथे हनुमान मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न

परळी : मंगेश वाघमारे सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील कसईशेत ठाकुरवाडी येथे रायगड भुषण ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमंत राय यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत प्राणप्रतिष्ठा महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवार दिनांक २५ /१२ / २०२१ रोजी वास्तु पुजा, नवग्रह पूजन, होम हवन विधी, हरिपाठ, जलावास, धान्यवास असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा तर रात्री ९ नंतर जागर भजन करण्यात आले. रविवार दिनांक २६ / १२ / २०२१ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळशारोहन, सत्यनारायणाची महापूजा, सामुदायिक हरिपाठ आणि रात्री ९ वाजता गुरुवर्य ह.भ.प. श्री. रामदास महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाला महाप्रसाद हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई रमेश पाठारे व संदेश सखाराम तवले यांच्या वतीने देण्यात आला. दिनांक २६ /१२ / २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना दत्तात्रेय सकपाळ यांनी कसईशेत ग्रामस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कसईशेत ग्रामस्थ हे मनमिळाऊ व संकटात धावून जाणारे आहेत. त्यांनी अतिशय परिश्रमाने हनुमानाचे मंदिर उभारले असून समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे. सम्यक क्रांती विचार मंचचे अध्यक्ष तथा पत्रकार मंगेश वाघमारे यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ठाकूर समाज हा प्रामाणिक, कष्टाळू आणि संघटनेने जगणारा समाज आहे. कितीही राजकारण झाले, वाद झाला तरी देखील ठाकुर समाज हा एकत्र बसूनच निर्णय घेतो. गावकीच्या निर्णयाच्या विरोधात कुणीही जात नसल्यामुळे ठाकूर समाजाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. ठाकूर समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून व्यसनापासूनही हा समाज दूर जाताना दिसत आहे. रायगड भूषण रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाची वाढ होत असून आदिवासी समाज देखील वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालताना दिसत आहे. ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांनी हनुमान मंदिराच्या मंदिरासाठी मोफत जागा उपलब्ध करून देणाऱ्या हिरू बामा शिद यांचा सत्कार करून आजच्या युगात फूटभर जागेसाठी भांडणाऱ्या लोकांमध्ये हिरु बामा शिद यांनी फार मोठे दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. अशी त्यागी माणसे फार कमी प्रमाणात आढळतात. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई पाठारे यांनी सांगितले की, कसईशेत ग्रामस्थांनी एकोपा दाखून हनुमानाचे मंदिर उभारले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कार्यक्रमाला पीएसआय राम पवार, मारुती पांगारे, उपसरपंच पंकज पाठारे, परळी ग्रामपंचायतीचे सदस्य महेश ठाकूर, रमेश विष्णू पाठारे, दत्तात्रय सपकाळ, माजी सरपंच शंकर कडू, माजी उपसरपंच अनंत भोसले, जगन्नाथ पाठारे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घोंगे, विठ्ठल सिंदकर, माजी सरपंच झिमा कोकरे, शाहीर दामोदर शिद, धावू हिरवा, काशिनाथ पाठारे, रमेश घोंगे, संदेश तवले यांच्यासह पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन हिरु वाघमारे, रमेश कानू वाघमारे, दिनकर सोमा शिद, मारुती हाशा निरगुडा, ताई किसन वाघमारे, इंदु गोमा ठोंबरे व कसईशेत ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त