सुधागड -(प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सुधागड तालुक्यातील वारकरी संप्रदाय एकत्र आणुन वारकरी परिषदेचे आयोजन सम्यक क्रांती विचार मंचच्या वतीने करण्यात आले.
सम्यक क्रांती विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबवितानाच महापुरुषांच्या सन्मानाबाबत विविध उपक्रम, जयंती, मयंती, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय /राजकीय /सामाजिक मदत मिळवून देण्यात अग्रेसर असतात.असेच उपक्रम राबवीत असताना संत गाडगेबाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्त मंगेश वाघमारे यांनी वारकरी संप्रदायास एकत्र आणत वारकरी परिषदेचे आयोजन केले.
सदर कार्यक्रमाची दखल संपूर्ण वारकरी संप्रदायानी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment