खोपोली -(रोहिदास वाणी )-खालापूर तालुक्यातील ३५०एकर जमीन शेतकऱ्यांकडून एका खाजकी कंपनीने विकत घेऊन लोकप्रतिनिधिच्या नातेवाईकांना विकत असल्याचा प्रकार समोर आल्याने व शेतकऱ्यांना अजुन पुर्ण रक्कम मिळत नसल्याने त्यांना न्याय मिळावा या उद्देश्याने माजी आमदार सुरेश लाड यांनी आज खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार होते. पण तांत्रिक बाबी मुळे त्यांचे आंदोलन स्थगित करून पुढे ढकलण्यात आले.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे, गोठीवली या ठिकाणी औद्योगिक कारणा करिता न्यूमिलेनियम कंपनीने शेतकऱ्यांकडून साधारण ३५० एकर जमीन विकत घेतली. ती जमीन आता सदर कंपनी काही लोकप्रतिनिधी यांच्या नातेवाईकांना विकण्याचा आरोप होत आहे.तसेच या शेतकऱ्यांना जमिनीचा पुर्ण मोबदला मिळाला नसल्याचे समोर आले. यानंतर मा. आमदार सुरेश लाड यांनी खालापूर तहसीलदार यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण कारवाई न झाल्याने आज २३/१२/२१रोजी लाड यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आत्मदहन करण्यास आले होते.
परंतु प्रशासनाच्या विनंतीवरून व तांत्रिक अडचणीमुळे सदर आंदोलन थांबाविले असून न्याय न मिळाल्यास सदर आंदोलन पुन्हा करण्यात येईल असा इशारा सुरेश लाड यांनी दिला आहे.
सदर आंदोलनात हनुमंत पिंगळे,अंकित साखरे, सुवर्णा संतोष मोरे,शरद लाड, विजय पाटिल, शेखर पिंगळे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment