खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली पोलीस ठाण्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, या वर्षीपासून पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विविध मुद्द्यांवर स्पर्धा सुरू करण्यात आली होती व या स्पर्धेच्या विजेत्यांना “विघ्नहर्ता पुरस्कार” सोहळा खोपोली शहरातील गगनगिरी महाराज यांच्या लगत असलेले कँम्पोलियन रिसाँर्ट येथे वरिल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रमासोबतच
पोलीस ठाणे आवारात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र विश्रामगृहाच्या इमारतीच्या वास्तुची पायाभरणी समारंभ पार पाडण्यात आला. 2021 या पारितोषिक वितरण सोहळ्यात रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे,खालापूर तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला ,खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल ,खोपोली पोलीस निरिक्षक शिरीष पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत
खोपोली शहरासाठी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या
अपघातग्रस्तांच्या मदतीला,
सहज सेवा फाउंडेशन,
खोपोली अॅक्ट,
अल्टा लॅबोरेटरीज
या ध्येयवेड्या वरिल चार सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले.
खोपोलीचे रहीवाशी असणारे कमांडर आशिष कोरे यांचा व्यक्तीविशेष म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला.
पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या गावातील सर्व पोलिस पाटलांना युनिफॉर्म देण्यात आले.
तर ग्रामीण भागांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करुन त्यांची ओळख पटावी म्हणून टी-शर्ट, काठी, शिट्टि इत्यादी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
तसेच लोकांचे हरविलेले २३ मोबाईल शोधून यावेळी लोकार्पण करण्यात आले.या सोहळ्या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment