खोपोली प्रतिनिधी :=( किशोर साळुंके )
कधीकाळी शिक्षण घेण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी 37 वर्षानंतर स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. विद्यार्थीदशेत निर्माण झालेली भावनात्मक बांधिलकी जपत आपल्या तत्कालीन शिक्षक, शिक्षका आणि मित्रांसमवेत एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशी मध्ये 1984 या वर्षी पास आउट झालेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आपला स्नेह द्विगुणित केला.
2 जानेवारी 2022 रोजी वावोशी जवळच्या आपटी गावातल्या राजेंद्र पाटील यांच्या फार्महाऊसवर या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, निवृत्त शिक्षक एस के पाटील आणि एम डी पाटील आणि निवृत्त शिक्षिका श्रीमती प्रमिला पवार आणि श्रीमती रंजना पाटील इत्यादी मान्यवर निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते.
आजवर आपण पोलीस दलात कामगिरी बजावत असताना क्राईम डिटेक्शनमध्ये फक्त गुन्हेगारांशी संवाद साधत आलो, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने सज्जन लोकांच्या समवेत हितगुज करण्याची संधी मिळाल्याने एका वेगळ्या आनंदाचा लाभ घेण्याचा योग आल्याचे प्रतिपादन करत असताना, आपणही अश्याच स्वरूपात आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना एकत्र आणून स्नेहसंमेलन साजरे करू असे अभिवचन सहायक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिले.
सामाजिक कार्य करत असताना आपल्या सोबत समाजातील दक्ष नागरिक म्हणून भूमिका बजावणाऱ्यांची आपल्याला नेहमीच मोलाची साथ मिळाल्याचे सांगत, आमच्या कामाची दखल घेऊन अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या अभियानातील सदस्यांना स्वखर्चाने ड्रेस कोड अर्थात युनिफॉर्म देणाऱ्या स्नेहसंमेलन आयोजकांचे आभार मानले. निवृत्त शिक्षिका आणि शिक्षकांनी गत स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी गप्पांच्या स्वरूपात संवाद साधला.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल, राजेंद्र पाटील, उद्योजक अजित भोसले, ज्येष्ठ शिक्षक संजय नेमाने या माजी विद्यार्थी आणि हात मदत करणाऱ्या देवदूतांचा सन्मान करण्यात आला. धोंडीबा हिरवे या आदिवासी समाजातल्या माजी विद्यार्थ्याने बालवयातील कवितांचे भावपूर्ण सादरीकरण केले. राजेंद्र पाटील, किशोर ओसवाल, संजय नेमाणे, प्रकाश घारे इत्यादीनी देखील यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव बाजूला सारून अखंड दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपला आनंद व्यक्त केला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment