Skip to main content

*क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी साप्ताहिक पत्री सरकार चा वर्धापन दिन संपन्न*

खोपोली :(रोहिदास वाणी ):रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार चा १७ वा वर्धापन दिन क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी जनता विद्यालय प्राथमिक शाळा येथे जल्लोषात साजरा झाला. रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, राजकीय, वैयक्तिक, सरकारी, न्यायालयीन अशा विविध स्तरावरील विषयांवर भाष्य करणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार यांस नविन वर्षात १७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने संपादक सचिन यादव यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत विविध विषय दिले असताना शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेत हि निबंध स्पर्धा यशस्वी पार पडली. मान्यवर शिक्षकांनी यथा योग्य असे परीक्षण करून त्यात विजयी विद्यार्थी निवडले. यात माध्यमिक शाळेतील विजयी विद्यार्थी होते आदित्य धनाजी थिटे (प्रथम क्रमांक ), ऋतुजा संतोष पाटिल(द्वितीय क्रमांक ), अस्मिता गणेश साठे (तृतीय क्रमांक )तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सन्मिष संतोष गायकर (प्रथम क्रमांक ), स्वरूपा भारत आढे (द्वितीय क्रमांक ), प्रतीक्षा राम जाधव (तृतीय क्रमांक )या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी जनता विद्यालय प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत केदारी, शिव सेना युवा नेते अनिल सानप, भाजप युवा नेते राहुल जाधव, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव बाबर, बहुजन युथ पॅन्थर खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके, सामाजिक कार्यकर्ते गणेश साळुंके,महेश काजळे,पत्रकार प्रशांत गोपाळे, प्रविण जाधव, आकाश जाधव, तय्यब खान, समाधान दिसले, अभिजित दरेकर, प्रविण कोल्हे, रोहिदास वाणी,मनोहर कांबळे, अमोल वाघमारे मुख्याध्यापक म्हात्रे सर, पाटिल सर, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व बक्षीस पात्र विद्यार्थी उपस्थित होते.तसेच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, जनता विद्यालय प्राथमिक व माध्यमिक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...