Skip to main content

खोपोली सुभाष नगर ग्रामस्थांच्या पथ दिप (स्ट्रीट लाईट) च्या मागणीला यश नवीन विद्युत पोल उभारणी कामाला सुरुवात - नागरिकांमध्ये समाधान

खोपोली :(प्रतिनिधी ): खोपोली शहरातील सुभाष नगर या भागात मोठ्या प्रमाणत लोकवस्ती असुन या ठिकाणी नागरी सुविधा व्हाव्यात यासाठी येथील प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता, त्यामध्ये निवेदन देऊन मागणी केलेल्या सुविधेमध्ये यापूर्वी रस्त्याची समस्या काही प्रमाणात सुटली असून नुकताच या भागातून प्रवास करताना उजेड नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने पालिकेच्या माध्यमातून या भागात रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट खांब बसविण्याचे काम सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुभाष नगर भाग हा मोठ्या लोकवस्तीचा असून या भागात 50 वर्षांपासून वस्ती आहे. या भागात मोठमोठे कारखाने असल्याने पालिकेला नागरी सुविधा देताना अडचणी भासत होत्या. मात्र येथील प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव व येथील गावकऱ्यांनी खोपोली नगरपालिकेकडे कडे नागरी सुविधाचा अभाव असल्याचे निवेदन दिले होते. त्यामध्ये रस्ता लाईट सह अन्य मागण्या केल्या होत्या, त्यानुसार रस्त्या बनविताना काही तांत्रिक अडचणी सोडवून रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले असून रस्त्याच्या बाजूने लाईट नसल्याने रात्रीच्या दरम्यान विशेषता महिला वर्गाला येथून प्रवास करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांचा पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी नगरपालिका व महिंद्रा कंपनीचे राहुल जाधव यांनी आभार मानले आहे. सुभाष नगर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, या ठिकाणी अनेक वर्षांपासून नागरी सुविधा व्हाव्यात म्हणून नागरिकांना बरोबर घेऊन नगरपालिकेला प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन अडीच वर्षे पाठपुरावा करीत होतो. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून येथील सुविधा देण्याचे काम काही प्रमाणात प्रगतीपथावर आहे, त्यामुळे भविष्यात येथील नागरिकांना व महिलांना अडचणीतून मुक्ती मिळेल. राहुल जाधव (प्रमुख ग्रामस्थ सुभाषनगर खोपोली)

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त