Skip to main content

केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषांच्या यादीतून वगळल्याने पिंपरीत निदर्शने.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी-- साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत वगळल्यामुळे भारतरत्न डॉ.पिंपरी चिंचवड मातंग समजामध्ये तिव्र संतापाची लाट पसरली असून पिंपरी चिंचवड येथील डाँ. बाबासाहेब आज केंद्र सरकार विरोधात आज दि. ८ जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले असून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने सूरु झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज *पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.* यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतात . त्यांचे म्हणणे असे आहे की, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले गेले नाही.आण्णा भाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीमध्ये नाव नाव जैसे थे न ठेवल्यास रस्यावर उतरुन अंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब अडागळे व शिवशाही व्यापरी संघाचे संस्थापक ,अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी, प्रयत्नवादी, वास्तववादी विचाराचे लोकशाहीर, साहित्यीक, कामगार नेता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व होते. अण्णाभाऊंनी असे लिहून ठेवले आहे की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कमगाराच्या श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे. म्हणून या मनूवादी संचालकाने अण्णाभाऊचे नाव घेण्याचे नाकारले असावे. म्हणून या संचालकाचा व सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करीत आहोत. या मंत्रालयाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत सामाविष्ठ करावे, ही मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. *या आंदोलनात सर्वश्री मातंग समाजाचे जेष्ट नेते भाऊसाहेब अडागळे, ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय ससाने, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, महाराष्ट्र दलित युवक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मारूती दाखले, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा अध्यक्ष सतिष भवाळ ,भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे, मा. अध्यक्ष युवा नेते नाना कसबे, भारतीय लहुजी पॅंथर संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे* गणेश आडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाऊ आल्हाट, आबा भवाळ, हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे, नितीन घोलप, मीना कांबळे, मालन गायकवाड, नंदा कांबळे, अक्षय दुनघव, आकाश शिंदे, प्रा. बी, बी. शिंदे, दुराजी शिंदे, उमेश हानवते, विट्ठल शिंदे, कल्पना कांबळे, चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, छबु कांबळे, दशरथ कांबळे, कैलास कसबे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त