Skip to main content

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचा गौरव... सहज निसर्ग शाळेचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून जागतिक उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव..

मुंबई... सहजसेवा फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असते.सातत्यपूर्ण उपक्रम ही सहजसेवेची ओळख आहे तर सामाजिक उपक्रमातुन नवनवीन जागतिक रेकॉर्ड ही संस्थेची उपलब्धी आहे. दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा ही वंचित व उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी वरदान ठरत आहे.झाडाखाली भरलेल्या शाळेला खऱ्या खुऱ्या शाळेचे रूप आलेले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था या शाळेसाठी भरीव योगदान देत आहेत. 26 जानेवारी 2022 रोजी वीटभट्टी कामगारांच्या सहज निसर्ग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.टाटा स्टील लिमिटेडचे आस्थापण प्रमुख कपील मोदी व खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल यांनी संस्थेच्या सहज अन्नसेवा, सहज मनोरुग्ण स्वच्छता, सहज स्वर्गरथ, सहज वैद्यकिय उपकरणे, सहज स्वर्गपेटी,सहज सामुदायिक विवाह,सहज आपत्कालीन मदत व विविध कार्याची माहिती घेऊन उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, सहज निसर्ग शाळेत शिक्षकरुपात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन, संघटक अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी रसायनी येथील कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे,नवी मुंबई येथील नीरज पंत उपस्थित होते.या उपक्रमात व्हिजन फ्रेश यांनी सह आयोजकाची भूमिका बजावली आहे. वंचित व उपेक्षित घटकांना सहजसेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते. लोकसहभागातून उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या मदत कार्यात भरीव योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार अर्पण केल्याची भावना संस्थेच्या कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त