Skip to main content

खोपोली :- स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग नामकरण करण्यासाठी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी घेतील मुख्याधिकारी यांची भेट. सुभाष नगर ग्रामस्थांच्या नामकरण मागणीचे केले समर्थन

खोपोली (खोपोली प्रतिनिधी):- सुभाष नगर ग्रामस्थांनी ५० वर्ष जुना रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाष नगर रस्त्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सरखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करून हा परिसर सुशोभीकरण करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी केली होती. ग्रामस्थांच्या या नामकरण मागणीला खोपोली नागरपरिषदेचे *माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे*, *सुमित्रा ताई कोळंबे*, *जयश्री साळुंखे*, *माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी,* *तुकाराम जाधव,* *पुष्पा ताई साबळे,* *माजी नगरसेवक तुकाराम शेठ साबळे,* *सूर्यकांत देशमुख,* *काशिनाथ पाटील,* *लक्ष्मण साळुंखे,* *कान्हू कोळंबे,* *शंकरराव सावंत,* *प्रकाश महाडीक,* *अंकुश पवाळी,* *दत्ता वाघमारे,* *जयेंद्र शेंडे,* *रामदास रासम,* *संजय घरडे* या सर्वांनी समर्थन देत मुख्याधिकारी अनुप दुरे यांना तसे निवेदन आज १० जानेवारी २०२२ रोजी दिले आहॆ. स्वर्गीय सखाराम गेणू जाधव हे अनेक वर्ष आमच्या सर्वाबरोबर खोपोली नगर परिषदे मध्ये लोक प्रतिनिधी म्हूणन काम करणारे आमचे सहकारी. महिंद्र कंपनी मध्ये सर्विस करणारे व युनियन मध्ये कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे कामगार नेते. खोपोली शहराच्या विकासासाठी व त्यांचा प्रभागातील लोक हिताचे व कामगारांचे प्रश्न मांडणारे एक अभ्यासू लोक प्रतिनिधी. खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणु जाधव सलग तीन वेळा निवडून येत हॅट्रिक केली. नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, आरोग्य सभापती. शिक्षण सभापती, नियोजन सभापती, परिवहन सभापती, मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती अनेक वर्षे स्थाही समितीचे सदस्य अशी पदे भूषवली होती. १ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. खोपोली शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, १५ वर्ष नगरसेवक व ज्येष्ठ नेते असलेल्या आमच्या या सहकारी मित्राचा सन्मान म्हणून या रस्त्याचे व घरा समोरील चौकाचे नामकरण करून परिसराचे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी व विनंती या सर्वांनी मुख्याधिकारी यांचा कडे केली. या वेळी स्वर्गीय सखाराम जाधव यांचे चिरंजीव व सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल सखाराम जाधव सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बावस्कर, विजय तेंडुलकर, विकास खुरपुढे, पत्रकार शेखर परब, आदी मान्यवर उपस्तीत होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...