Skip to main content

गगनगिरीनगर येथे उद्यान व ओपन जीम चे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धघाटन सोहळा संपन्न .. कार्यसम्राट समजल्या जाणार्या माजी नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे यांचे सर्वत्र कौतुक ..

. खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली नगरपरिषद हद्दितील गगनगिरीनगर येथील कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्या स्थानिक नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या उद्यानाचे व खुल्या व्यायाम शाळेचे उद्धघाटन रायगड जिल्हापरिषदेच्या सदस्या चित्राताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.आपल्या प्रभागासाठी प्रामाणिकपणे अनेक भरीव विकासकामे करुन आपल्या पदाला खर्या अर्थाने न्याय देणारे फारच कमी नगरसेवक , नगरसेविका शहरात पहायला मिळत असून त्यापैकी एक माधवी रिठे या भरीव विकासकामे करणार्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. म्हणून त्यांना प्रभागातच नाही तर शहरात त्यांना कार्यसम्राट नगरसेविका म्हणून बोलले जाते.खोपोली नगरपरिषदेच्या वतीने खोपोली नगरपरिषद हद्दित काही मोजक्याच प्रभागांमधे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे पहावयास मिळते.त्याच माध्यमातून गगनगिरीनगर येथील नगरसेविका माधवी रिठे यांच्या मागणी व पाठपूराव्या नूसार भव्य असे उद्यान व खुल्या व्यायाम शाळेचे उद्धघाटन करण्यात आले.तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील गगनगिरी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी लेझीमचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक महीलांनी यात सहभाग घेतला तर माधवी रिठे यांनीही लेझीम खेळण्याचा आनंद लूटला तसेच होममिनिस्ट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .खेळ रंगला पैठणीच्या या होममिनिस्ट या खेळामधे प्रथम क्रमांक सिंधुताई विणेरकर तर द्वितीय क्रमाक सोनम जाधव पटकवला माधवी रिठे यांनी सुंदररित्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे रिठे यांचे उपस्थितीतांकडून यावेळी भरभ कौतुक होताना दिसत होते शुभ प्रसंगी या उद्यानाचे व खुल्या जिमचे उद्धघाटन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खालापूर नगरपंचायतीच्या मा.नगराध्यक्षा शिवानी जंगम , विद्यमान नगरसेवक संतोषभाई जंगम ,खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अविनाश तावडे, अमोल जाधव , नितीन मोरे, महिला नगरसेविका , विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...