गांधीजी यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापेक्षाही चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानवतेला जिवंत ठेवणारा सत्याग्रह .. भाईसाहेब जाधव
खोपोली ( किशोर साळुंके )
महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी माहाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती घडवून आणली. महाडच्या त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त २० मार्च २०२२ रोजी चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिना निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्सा संखेत आंबेडकर अनुयायी महाडमधे दाखल झाले होते. .सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर चवदार परिसरातील क्रांती भूमीत हजारोच्सा संखेने भीम अनुयायी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दरी संपुष्टात यावी यासाठी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन देशात सामाजिक क्रांती घडवून आणली होती. चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी तमाम भिम सैनिक , भिम प्रेमी, विविध सामाजिक संघटणा , शासकीय आधिकारी, राजकीय पुढारी उपस्थितीत राहून चवदार तळ्यातील पाणी प्राशन करुन तळ्यातील पाण्याला स्पर्श करुन चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला यावेळी उजाळा दिला. बहुजनांच्या प्रश्नांबाबत तडजोड न करता प्रामाणिकपणे त्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे, संघर्ष पुरुष समजले जाणारे बहुजन युथ पँथर या सामाजिक संघनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे प्रेरणास्थान समजले जाणारे भाईसाहेब जाधव यांनी चवदार तळे आणि क्रांती स्तंभ येथील महामानव डाँ,बाबासाहेब आंबेडकरांच्य प्रतीमेसमोर नतमस्तक होवून अभिवादन केले. क्रांती स्तंभ व चवदार तळ्याकडे जण्या अगोदर भाईसाहेबांनी महाड येथील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व क्रांती स्तंभा येथे बहुजन युथ पँथरचे शेकडो कार्यकर्ते व हजारोच्सा संखेत उपस्थित असलेल्या भिम अनुयायी यांच्या समोर भाईसाहेब जाधव यांनी जाहीर सभा घेतली.गांधीजींनी कालेल्या मिठाच्या सत्याग्रहापेक्षाही चवदार तळ्याचा संघर्ष हा मानवतेला जिवंत ठेवणारा संघर्ष होता.समाजातील जातीयवादी दरी संपुष्टात करणारा सत्याग्रह होता .मिठा शिवाय माणूस जिवंत राहू शकतो परंतू पाण्या अभावी माणूस जिवंत राहूच शकत नाही म्हणून गांधीजी यांच्या पेक्षाही बाबासाहेब दहा पावले नक्कीच पूढे होते.त्यामुळे या आजच्या क्रांती दिनी माझ्या तमाम कार्यकर्यांना आज मी शपथ देत आहे कि यापूढे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना न चूकता राष्ट्रपीता डाँ.बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख करण्यात यावा.तसेच बाबासाहेब नसते तर हा देश एक संघ नसता .बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळेच खर्चा अर्थाने देशात परिवर्तनाची ठिणगी पडली व मानवतेला जिवंत ठेवणारा हा सत्याग्रह ठरल्याचे या जाहीर सभेत बोलत होते.या दिनी बहुजन युथ पँथर संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रँलीचे आयोजन केले होते.माणगाव ते महाड पर्यंत बाईक रँली काढण्यात आली. या रँलीमध्ये बहुजन युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता .भाईसाहेबांच्या कार भोवती अनेक चार चाकी वाहनांचा ताफा होता.१४ एप्रिल २०२२ रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा व सदर जयंतीस प्रशासनाने अडथळे आणल्यास माझ्या 9969155023 या मोबाईल नंबरवर फोन करा असे आवाहन यावेळी भाईसाहेब जाधव यांनी करताच भाईसाहेबांच्या आक्रमक भाषणाणे प्रभावित होवून अनेक भिम अनुयायांनी भाईसाहेबांचा फोन नंबर घेण्यास उत्सुकता दाखवल्याचे यावेळी दिसून आले,
Comments
Post a Comment