Skip to main content

गांधीजी यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापेक्षाही चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानवतेला जिवंत ठेवणारा सत्याग्रह .. भाईसाहेब जाधव

खोपोली ( किशोर साळुंके ) महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी माहाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती घडवून आणली. महाडच्या त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त २० मार्च २०२२ रोजी चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिना निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्सा संखेत आंबेडकर अनुयायी महाडमधे दाखल झाले होते. .सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर चवदार परिसरातील क्रांती भूमीत हजारोच्सा संखेने भीम अनुयायी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दरी संपुष्टात यावी यासाठी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन देशात सामाजिक क्रांती घडवून आणली होती. चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी तमाम भिम सैनिक , भिम प्रेमी, विविध सामाजिक संघटणा , शासकीय आधिकारी, राजकीय पुढारी उपस्थितीत राहून चवदार तळ्यातील पाणी प्राशन करुन तळ्यातील पाण्याला स्पर्श करुन चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला यावेळी उजाळा दिला. बहुजनांच्या प्रश्नांबाबत तडजोड न करता प्रामाणिकपणे त्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे, संघर्ष पुरुष समजले जाणारे बहुजन युथ पँथर या सामाजिक संघनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे प्रेरणास्थान समजले जाणारे भाईसाहेब जाधव यांनी चवदार तळे आणि क्रांती स्तंभ येथील महामानव डाँ,बाबासाहेब आंबेडकरांच्य प्रतीमेसमोर नतमस्तक होवून अभिवादन केले. क्रांती स्तंभ व चवदार तळ्याकडे जण्या अगोदर भाईसाहेबांनी महाड येथील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व क्रांती स्तंभा येथे बहुजन युथ पँथरचे शेकडो कार्यकर्ते व हजारोच्सा संखेत उपस्थित असलेल्या भिम अनुयायी यांच्या समोर भाईसाहेब जाधव यांनी जाहीर सभा घेतली.गांधीजींनी कालेल्या मिठाच्या सत्याग्रहापेक्षाही चवदार तळ्याचा संघर्ष हा मानवतेला जिवंत ठेवणारा संघर्ष होता.समाजातील जातीयवादी दरी संपुष्टात करणारा सत्याग्रह होता .मिठा शिवाय माणूस जिवंत राहू शकतो परंतू पाण्या अभावी माणूस जिवंत राहूच शकत नाही म्हणून गांधीजी यांच्या पेक्षाही बाबासाहेब दहा पावले नक्कीच पूढे होते.त्यामुळे या आजच्या क्रांती दिनी माझ्या तमाम कार्यकर्यांना आज मी शपथ देत आहे कि यापूढे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना न चूकता राष्ट्रपीता डाँ.बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख करण्यात यावा.तसेच बाबासाहेब नसते तर हा देश एक संघ नसता .बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळेच खर्चा अर्थाने देशात परिवर्तनाची ठिणगी पडली व मानवतेला जिवंत ठेवणारा हा सत्याग्रह ठरल्याचे या जाहीर सभेत बोलत होते.या दिनी बहुजन युथ पँथर संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रँलीचे आयोजन केले होते.माणगाव ते महाड पर्यंत बाईक रँली काढण्यात आली. या रँलीमध्ये बहुजन युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता .भाईसाहेबांच्या कार भोवती अनेक चार चाकी वाहनांचा ताफा होता.१४ एप्रिल २०२२ रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा व सदर जयंतीस प्रशासनाने अडथळे आणल्यास माझ्या 9969155023 या मोबाईल नंबरवर फोन करा असे आवाहन यावेळी भाईसाहेब जाधव यांनी करताच भाईसाहेबांच्या आक्रमक भाषणाणे प्रभावित होवून अनेक भिम अनुयायांनी भाईसाहेबांचा फोन नंबर घेण्यास उत्सुकता दाखवल्याचे यावेळी दिसून आले,

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...