Skip to main content

राष्ट्रवादी महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या कार्य आढावा अहवालाचे लोकार्पण संपन्न

खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खोपोली महिला अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे (गायकवाड )यांनी शहर अध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा अहवाल तयार करून मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करून विविध मान्यवरांना सदर अहवाल भेट देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात तरुणांची फळी उभी करण्यास सुरुवात झाली. पक्षातील प्रत्येक घटकात, कमीट्यानमध्ये वरिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची फळी उभारण्याचे काम सुरु झाले. यात महिला कमिटी सुद्धा आली आणि सर्व राज्यात युवा कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे कार्य सुरु असताना खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा पदी सुवर्णा संतोष मोरे यांची निवड रायगड चे महामहीम खासदार सुनिल तटकरे यांनी केली. सुवर्णा मोरे यांनी खोपोली शहर अध्यक्षा म्हणून पदाभार स्वीकारल्यापासूनचा त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच गेला आणि जात आहे. महिला सक्षमीकरण असो, मुलांच्या कला गुणांना वाव मिळणे असो, वृक्षारोपण असो, मदत असो, सामाजिक उपक्रम असो, जनतेच्या भल्यासाठी शासनाचा निषेध असो, महिला एकत्रीकरण असो,प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा वाखानन्याजोगाच आहे. या खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनचा सर्व प्रवास या लोकार्पण केलेल्या कार्य आढावा अहवालात नमूद केला असून पक्षाच्या वरिष्ठ मान्यवरांनी व अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केला. कोरोना काळामुळे लोकार्पण सोहळा कार्यालयीन करण्यात आल्या नंतर सदर अहवाल विविध मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आला. संबंधित छायाचित्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, रायगड जिल्हा माजी अध्यक्ष /खोनपा मा. नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, युवक अध्यक्ष अतुल पाटिल,खोनपा नगरसेवक मोहन औसरमल, खोपोली पत्रकार संघांचे कार्याध्यक्ष सचिन यादव यांना महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे सदर अहवाल भेट म्हणून देताना पहावयास मिळत आहे. ........... (संपादक)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...